भारतीय रेल्वेकडून महाकुंभ 2025 साठी डिजिटल तिकीट बुकिंगची नवीन सोय

Mahakumbh 2025 : भारतीय रेल्वेने 2025 महाकुंभमेळ्याच्या तयारीत एक मोठा बदल केला आहे. रेल्वे प्रशासनाने डिजिटल तिकीट बुकिंगसाठी एक सोपी आणि वेगळी पद्धत सुरू केली आहे. प्रयागराज रेल्वे बोर्ड महाकुंभात प्रथमच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जॅकेट्सवरून  डिजिटल रेल्वे तिकीट काढण्याची  सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
[gspeech type=button]

भारतीय रेल्वेने 2025 महाकुंभमेळ्याच्या तयारीत एक मोठा बदल केला आहे. रेल्वे प्रशासनाने डिजिटल तिकीट बुकिंगसाठी एक सोपी आणि वेगळी पद्धत सुरू केली आहे. प्रयागराज रेल्वे बोर्ड महाकुंभात प्रथमच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जॅकेट्सवरून  डिजिटल रेल्वे तिकीट काढण्याची  सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या पद्धतीद्वारे, भाविक तिकीट बुकिंगसाठी लांब रांगा न लावता, क्यूआर कोड स्कॅन करून सहज तिकीट बुक करू शकतात.

हिरव्या जॅकेट्सवर क्यूआर कोड

महाकुंभ 2025  मेळ्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन उत्तर मध्य रेल्वेने प्रयागराजला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ही  विशेष व्यवस्था केली आहे. याबाबत बोलताना प्रयागराज रेल्वे विभागाचे वरिष्ठ पीआरओ अमित मालवीय म्हणाले की, महाकुंभ दरम्यान रेल्वेच्या वाणिज्य विभागाचे कर्मचारी प्रयागराज जंक्शनवर हिरवे जॅकेट परिधान करून स्पेशल ड्युटीवर तैनात असतील. या जॅकेटच्या मागील बाजूस एक QR कोड छापलेला असेल,भाविक  क्यूआर कोड स्कॅन करून ‘यूटीएस अॅप’ डाउनलोड करू शकतात आणि डिजिटल पद्धतीने तिकीट बुक करू शकतात.

तिकिटांसाठी रांगेची गरज नाही

या सुविधेमुळे भाविकांना तिकीट खिडकीवर लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट बुकिंग केल्यामुळे वेळ वाचेल आणि गर्दी कमी होईल. लाखो भाविकांसाठी ही व्यवस्था अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे.  

तिकिट काउंटर आणि विशेष गाड्या

महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज रेल्वे स्थानकावर 560 तिकीट काउंटर उघडण्यात आले आहेत. या माध्यमातून दररोज 10 लाख तिकिटं वितरित केली जातील. याशिवाय 10,100 नियमित आणि 3,124 विशेष गाड्या चालवल्या जातील. यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सोयीचा होईल.  

महाकुंभ रेल सेवा ॲप 

रेल्वेने ‘महाकुंभ रेल सेवा 2025’ नावाचे ॲप सुरू केले आहे. या ॲपवरून गाड्यांची वेळ, प्रवासाचे तिकीट, स्टेशनवरील सुविधा, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि वेटिंग रूम याबद्दलची माहिती मिळेल. भाविकांना स्थानकापासून जत्रेपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शनही दिले जाईल. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 1 नोव्हेंबरपासून 1800-4199-139 हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. या नंबरवर 24 तास सेवा उपलब्ध असेल आणि विविध भाषांमध्ये मदत दिली जाईल.  

रेल्वेच्या कॅशलेस आणि डिजिटल तिकीट बुकिंग सुविधेमुळे महाकुंभ मेळ्याला येणाऱ्या भाविकांना तिकीटासाठी रांगा टाळता येतील. या उपक्रमामुळे प्रवास सुलभ होईल आणि डिजिटल इंडिया मोहिमेला प्रोत्साहन मिळेल.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वारंवर चालणारी क्रीया म्हणजे वारी. या वारीला हजारो वर्षांची परंपरा आहे. साक्षात भगवान शंकर हे पहिले वारकरी मानले जातात. पण
Pandharpur Wari : वर्षातून चारदा होणाऱ्या वाऱ्या हे पंढरपुरचे वैशिष्ट्य. शिवाय महिन्याच्या एकादशीला येणारे भाविक वेगळेच. वर्षभराचा विचार केला तर
Vedh Shivkalacha : काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की भारताने सिंधु करार स्थगित केला आहे आणि पाकिस्तानची वेगळ्या प्रकारे नाकाबंदी केली

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ