मुंबई आणि बॉलीवूडचं कनेक्शन

Bollywood: बॉलीवूड' नावाच्या उद्योगाची 1913 मध्ये सुरुवात झाली. 'दादासाहेब फाळके' नावाच्या एका मराठी माणसाने राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट तयार केला आणि तिथून आपल्यातील कलागुणांना वाव देणारी ही इंडस्ट्री सुरू झाली. 1931 मध्ये पहिला हिंदी बोलपट हा 'आलम आरा' प्रदर्शित झाला होता. हिमांशू रॉय या कलाकार, दिगदर्शक आणि निर्माता व्यक्तीला या सिनेमाचं आणि 'बॉम्बे टॉकीज' या मुंबईतील पहिल्या स्टुडिओच्या निर्मितीचं श्रेय दिलं जातं.
[gspeech type=button]

प्रामुख्याने हिंदी भाषेतून मनोरंजन निर्मिती करण्याचा ‘बॉलीवूड सिने उद्योग’ हा एखाद्या अस्खलित हिंदी बोलणाऱ्या एखाद्या शहरांत, राज्यांत कसा होत नाही ? हा प्रश्न कित्येक वर्ष अनुत्तरित आहे. दादासाहेब फाळके या मराठी माणसाने पहिला मूकपट तयार केला हे कदाचित त्याचं कारण असावं. पण, ते तर नाशिकचे होते. तिथून हा उद्योग मुंबईकडे कसा वळला ? याचं उत्तर ब्रिटिशांनी इथे सुरुवात करून ठेवलेली शहरं, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दळणवळणाची व्यवस्था कदाचित हे असावं. या सर्व भौतिक कारणांपेक्षाही सर्वात महत्वाचं वाटतं ते मराठी माणसाचं कला, सिनेमा क्षेत्रावर असलेलं प्रेम. सिनेमा हे आपल्यासाठी केवळ मनोरंजनाचं माध्यम नाहीये, आपल्या जीवनाचा भाग आहे. सिनेमाशी आपलं एक अतूट नातं आहे आणि म्हणून खरं तर बॉलीवूड हे मुंबईत आहे.

भाषा आणि तंत्रज्ञांचा अडसर नाही

बॉलीवूडच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर, चित्रपट उद्योग निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच कॅमेरामन, त्याचे सहकारी, स्पॉट बॉईज् , लाईटमन, ज्युनिअर आर्टिस्ट हे भाषेची कोणतीही अडसर इथे येत नाही. टॉलीवूड किंवा मॉलीवूड सारख्या इतर सर्व प्रादेशिक सिनेउद्योग निर्मितीमध्ये निर्मात्यांना भाषा ही एक अडसर असते; ज्यामुळे त्यांना केवळ स्थानिक लोकांवर अवलंबून रहावं लागतं. मुंबई मध्ये हे सर्व प्रश्न संपतात आणि केवळ प्रेक्षकांना क्लिक होईल अशी कलाकृती कशी तयार करता येईल ? यावर लक्ष केंद्रित केलं जातं.

मुंबईतल्या पहिल्या स्टुडिओचं श्रेय

‘बॉलीवूड’ नावाच्या उद्योगाची 1913 मध्ये सुरुवात झाली. ‘दादासाहेब फाळके’ नावाच्या एका मराठी माणसाने राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट तयार केला आणि तिथून आपल्यातील कलागुणांना वाव देणारी ही इंडस्ट्री सुरू झाली. 1931 मध्ये पहिला हिंदी बोलपट हा ‘आलम आरा’ प्रदर्शित झाला होता. हिमांशू रॉय या कलाकार, दिगदर्शक आणि निर्माता व्यक्तीला या सिनेमाचं आणि ‘बॉम्बे टॉकीज’ या मुंबईतील पहिल्या स्टुडिओच्या निर्मितीचं श्रेय दिलं जातं.

बॉलीवूडची पहिली जोडी

हिंदी सिनेमाची अधिक आणि अजून मोठ्या प्रमाणावर निर्मिती करता यावी यासाठी सासाधर मुखर्जी यांच्यासोबत व्यवसायिक भागीदारी केली. हिमांशू रॉय आणि त्यांची पत्नी देविका राणी ही मोठ्या पडद्यावर दिसलेली बॉलीवूडची पहिली जोडी होती. ‘बॉम्बे टॉकीज’ ने 1937 मध्ये सासाधर मुखर्जी यांचे मेहुणे अशोक कुमार यांना सिनेमातून काम करण्याची संधी दिली. ‘जीवन प्रभात’, ‘अछूत कन्या’ आणि ‘किस्मत’ हे त्यांनी निर्मिती केलेल्या पहिल्या काही सिनेमांची नावं होती. तिथून सुरू झालेला सिलसिला हा अव्याहतपणे सुरू आहे.

सिनेमाचे वारकरी

सिनेमा सुरू राहावा याची धुरा काही काळासाठी शाम बेनेगल, सत्यजित रे, यश चोप्रा, सलिम-जावेद सारख्या दिग्गज व्यक्तिमत्वांनी सांभाळली. पुढील पिढीने त्यांचं अनुकरण करत आपलं योगदान दिलं आणि ही ज्योत तेवत ठेवली. सिनेमा म्हणजेच एक गोष्ट सांगण्यासाठी जागा, कॅमेरा, लाईट्स अशा बऱ्याच गोष्टींचा संच गरजेचा असतो. या उद्योगाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद बघून मुंबई शहर हे स्वतःला या उद्योगासाठी तयार करत गेलं. सृष्टीच्या निर्मिती पासून मनुष्य जशी आपली प्रगती इथवर करत आला तशी मुंबईतील स्टुडिओज् ने आपली प्रगती केली आणि सिनेउद्योगाचं खुल्या मनाने स्वागत केलं.

मुंबईतील स्टुडिओंची वाटचाल

गोरेगाव येथील ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ला भेट दिल्यावर लक्षात येतं की, मुंबई या स्वप्ननगरीने किती लोकांचं करिअर घडवलं आहे, घडवत आहे. सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसिरीज, डोक्युमेन्ट्री सारखी कोणतीही कन्सेप्ट लेखक, निर्माते इथे घेऊन येतात आणि त्यासाठी लागणारा स्टुडिओ, तंत्रज्ञ इथे सहज उपलब्ध होतात. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथे ‘नीचा नगर’, ‘दो भीगा जमीन’, ‘नया दौर’, ‘आवारा’, ‘आन’, ‘श्री 420’, ‘प्यासा’, ‘मुघल-ए-आझम’ सारख्या सिनेमांनी चित्रपट उद्योग निर्मितीला नवी चालना मिळाली.

मेहबूब स्टुडिओ

बांद्रा पश्चिम येथील ‘मेहबूब स्टुडिओ’ ही वास्तू देखील कित्येक सिनेमांच्या निर्मितीची साक्षीदार आहे. 1954 मध्ये दिगदर्शक, निर्माता मेहबूब खान यांनी या स्टुडिओचं बांधकाम केलं होतं. 4 एकर इतक्या जागेत बांधण्यात आलेल्या या स्टुडिओमध्ये 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मदर इंडिया’चं शुटिंग झालं होतं.

यशराज फिल्म्स स्टुडिओ

अंधेरी पश्चिम भागातील यशराज फिल्म्स स्टुडिओ हे देखील त्यांच्या बॅनरखाली निर्मिती होणाऱ्या सिनेमांसोबतच इतर सिनेमांसाठी देखील ऑडिओ रेकॉर्डिंग, स्टुडिओ डेली, मंथली रेंटल, डबिंग, व्हिएफएक्स अशा सर्व्हिसेस सुरू करून नव निर्माता, दिगदर्शकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.

चांदीवली स्टुडिओ

चांदीवली येथील ‘चांदीवली स्टुडिओ’ ही वास्तू देखील वाढत्या स्पर्धेतही आपलं एक अस्तित्व टिकवून आहे. या जागेमध्ये कित्येक टीव्ही सिरियल्स, वेबसिरीज यांची शुटिंग होत असते. या जागेमध्ये उभारण्यात आलेलं मंदिर, समोर असलेली हिरवळ आणि आत असलेली कोर्ट रूम ही आपण छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर नक्कीच बघितली असेल.

वेदर फिल्म्स स्टुडिओ

मालाडच्या ‘वेदर फिल्म्स स्टुडिओ’ला देखील निर्मात्यांनी ४.८ इतकी गुगल रेटिंग दिलेली आहे. शुटिंग, डबिंग, रेकॉर्डिंग, व्हिडीओ एडिटिंग सारख्या सर्व्हिसेस इथे निर्मात्यांना उपलब्ध करून दिल्या जातात.

सिने मॅनिया फिल्म स्टुडिओ

वर्सोवा येथील ‘सिने मॅनिया फिल्म स्टुडिओ अँड प्रॉडक्शन’ कंपनीमध्ये कास्टिंग, कमर्शियल व्हिडीओज्, एडिटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, ऍक्टिंग, कमर्शियल फोटोग्राफी, पोर्टफोलिओ सारख्या सर्व्हिसेस दिल्या जातात.

मुंबईच्या कोणत्याही भागांत फिरतांना मनोरंजन क्षेत्राशी निगडित एखादी तरी वास्तू, चौक ही आपल्याला दिसून येते. मध्यंतरी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईचा दौरा करून हा प्रयत्न केला होता की, बॉलीवूडचं मूळ मुंबईतून उखडून नॉएडा येथे त्याला प्लान्ट करावं आणि आपल्या राज्याची अजून प्रगती करावी. पण, हा प्रयत्न असफल राहिला. उत्तर भारतात सिनेमा निर्मितीसाठी आधीपेक्षा सुसह्य वातावरण निर्माण झालं आहे. पण, जी मजा मुंबईत आहे ती इतर कुठेच नाहीये हे केवळ आम्हीच नाही तर बॉलीवूडमधील सर्वच प्रस्थापित कलाकार म्हणतात हे खऱ्या अर्थाने प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवोद्गार आहेत.

1 Comment

  • ठिणगी

    पण मग आता असा प्रश्न पडतो कि हिंदी सिनेमे इतके चालतात आणि त्याच्या रिते मराठी चित्रपट मुळात नाहीच. आणि ह्यात काही प्रेक्षकांच्या संख्येचा प्रश्न नाहीच आहे. कुठे तरी मराठी चित्रपट पुन्हा चांगल्या पद्धतीत बनवण्याची गरज आहे. मला तर वाटत शासनाने पुण्यात किंवा नवी मुंबईत एक नवीन, मराठी चित्रपट सृष्टी म्हणून एक फिल्म सिटी नेमली पाहिजे. बहुतेक लोक विचारतील, मराठी चित्रपटच काय आहे ह्यात, हिंदी आहे तर. आणि जरका मराठी चित्रपट बनवायचे असतील जरी, असलेल्या फिल्म सिटी मधेच बनवा कि. तर पहिल्या गोष्टीच सांगायचं झाला तर, मराठी चित्रपट बनवल्याने, येत्या पिढीला आपल्या मराठीपणाला जप्त येईल. ह्याने बाहेरून आलेले, आणि आता महाराष्ट्रात settle झालेले लोकं, ह्यांना भाषेची गोडी निर्माण होईल, जेणे करून मराठी युवा आपल्या मराठी भाषेला आपल्या जीवनात अभिमानाने मिरवेन. सुरस सांगायचं झाला तर म्हणजे नवीन फिल्म सिटी का?? तर त्याच हे कि एक नवीन कोरी फिल्म सिटी “मराठी चित्रपट सृष्टी” बनवल्याने, मराठी श्रोते आणि त्याबरोबर मराठी कलाकार, मराठी दिग्दर्शक ह्यांना अद्वितीय मान मिळेल. ह्या अनुषंगाने एक महत्त्वाची गोष्टी घडेल कि, समाजात ही चाहुल, सरसकट घरा-घरात जाईल, ज्याने चर्चा होऊ लागेल, एक नवीन काळाची सुरुवात होईल, ज्यात मराठी श्रोते मराठी चित्रपट बघण्यासाठी उत्सुक राहतील, हिंदी च्या ऐवजी मराठीत चित्रपट बघतील. मला तर हे देखील वाटतंय कि हिंदी मधील चित्रपट मराठीत डब झाले पाहिजे .कारण अगदी सोपं आहे, भाषा कानावर पाळावी, भाषेच्या द्वारे कला पोहोचावी, भाषा आपली असावी जेणेकरून चित्रपट मधील सर्वे संवाद मराठीत मिरवण्यात येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

  1. पण मग आता असा प्रश्न पडतो कि हिंदी सिनेमे इतके चालतात आणि त्याच्या रिते मराठी चित्रपट मुळात नाहीच. आणि ह्यात काही प्रेक्षकांच्या संख्येचा प्रश्न नाहीच आहे. कुठे तरी मराठी चित्रपट पुन्हा चांगल्या पद्धतीत बनवण्याची गरज आहे. मला तर वाटत शासनाने पुण्यात किंवा नवी मुंबईत एक नवीन, मराठी चित्रपट सृष्टी म्हणून एक फिल्म सिटी नेमली पाहिजे. बहुतेक लोक विचारतील, मराठी चित्रपटच काय आहे ह्यात, हिंदी आहे तर. आणि जरका मराठी चित्रपट बनवायचे असतील जरी, असलेल्या फिल्म सिटी मधेच बनवा कि. तर पहिल्या गोष्टीच सांगायचं झाला तर, मराठी चित्रपट बनवल्याने, येत्या पिढीला आपल्या मराठीपणाला जप्त येईल. ह्याने बाहेरून आलेले, आणि आता महाराष्ट्रात settle झालेले लोकं, ह्यांना भाषेची गोडी निर्माण होईल, जेणे करून मराठी युवा आपल्या मराठी भाषेला आपल्या जीवनात अभिमानाने मिरवेन. सुरस सांगायचं झाला तर म्हणजे नवीन फिल्म सिटी का?? तर त्याच हे कि एक नवीन कोरी फिल्म सिटी “मराठी चित्रपट सृष्टी” बनवल्याने, मराठी श्रोते आणि त्याबरोबर मराठी कलाकार, मराठी दिग्दर्शक ह्यांना अद्वितीय मान मिळेल. ह्या अनुषंगाने एक महत्त्वाची गोष्टी घडेल कि, समाजात ही चाहुल, सरसकट घरा-घरात जाईल, ज्याने चर्चा होऊ लागेल, एक नवीन काळाची सुरुवात होईल, ज्यात मराठी श्रोते मराठी चित्रपट बघण्यासाठी उत्सुक राहतील, हिंदी च्या ऐवजी मराठीत चित्रपट बघतील. मला तर हे देखील वाटतंय कि हिंदी मधील चित्रपट मराठीत डब झाले पाहिजे .कारण अगदी सोपं आहे, भाषा कानावर पाळावी, भाषेच्या द्वारे कला पोहोचावी, भाषा आपली असावी जेणेकरून चित्रपट मधील सर्वे संवाद मराठीत मिरवण्यात येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ