अंतराळातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नासाची 3 अब्ज डॉलरची ऑफर

Luna Recycles Mission : अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यामध्ये मानवी विष्ठा, मूल विसर्जन आणि उलट्या यासारख्या मानवी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं तंत्र अजूनही विकसीत झालेलं नाही आहे. त्यामुळे तब्बल 50 वर्षापूर्वी चंद्रावर मानवी विष्ठेसारख्या कचऱ्याच्या ज्या पिशव्या टाकून ठेवलेल्या त्या अजूनही त्याच स्थितीत आहेत. अंतराळात मानवी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी यासाठी विशेष तंत्र विकसीत करण्याचं आवाहन नासाने जगातील सर्व लोकांना दिलं आहे. 
[gspeech type=button]

अवकाश संशोधन विषयात आज प्रत्येक देश झपाट्याने विकास करत आहे. अनेक देश अवकाशात आपले यान पाठवून नवनवीन क्षेत्राची माहिती गोळा करत आहे. या सगळ्या प्रक्रियेत अंतराळात मोठ्या प्रमाणात कचराही निर्माण होत आहे. या कचऱ्यामध्ये मानवी विष्ठा, मूल विसर्जन आणि उलट्या यासारख्या मानवी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं तंत्र अजूनही विकसीत झालेलं नाही आहे. त्यामुळे तब्बल 50 वर्षापूर्वी चंद्रावर मानवी विष्ठेसारख्या कचऱ्याच्या ज्या पिशव्या टाकून ठेवलेल्या त्या अजूनही त्याच स्थितीत आहेत. 

हे जर असंच सुरू राहिलं तर चंद्रावर वस्ती निर्माण करण्याआधी या अशा कचऱ्याचं साम्राज्य निर्माण होईल. त्यामुळे अंतराळात मानवी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी यासाठी विशेष तंत्र विकसीत करण्याचं आवाहन नासाने जगातील सर्व लोकांना दिलं आहे. 

‘लूना रिसायकल चॅलेंज’ 

नासा म्हणते की, अंतराळातील मानवी कचऱ्याचं विल्हेवाट लावणारी प्रणाली विकसीत करणाऱ्याला नासाकडून 3 अब्ज डॉलरचं बक्षीस दिलं जाईल. या मिशनला त्यांनी ‘लूना रिसायकल चॅलेंज’ असं नाव दिलं आहे. चंद्रावरच्या मोहिमा आणि अंतराळातील जास्त दिवसाच्या मोहिमांमध्ये या मानवी कचऱ्यांच्या विल्हेवाट तंत्राचा उपयोग केला जाईल, हेही नासाने स्पष्ट केलं आहे.  

1960  आणि 1970 च्या दरम्यान अपोलो मिशन राबवण्यात आलं होतं. या मिशनच्या वेळी चंद्रावरचे दगडाचे नमुने आणण्यासाठी तत्कालीन अंतराळवीर मानवी विष्ठेसारख्या कचऱ्याच्या जवळपास 96 पिशव्या चंद्रावरच ठेवून आले. कारण या कचऱ्यासह नमुनेदाखल गोळा केलेले दगड घेऊन येणं शक्य नव्हतं. अंतराळयानाचं वजन संतुलित ठेवणं ही आवश्यक होतं.  

मात्र इतक्या वर्षानंतरही हा कचरा त्याच स्वरुपात चंद्रावर पडून आहे. त्यामुळे आता या कचऱ्याचं रुपांतर खतं, उर्जानिर्मिती किंवा पिण्याच्या पाण्यासाठी करता येईल का? असा एक विचार नासाने मांडला आहे. त्यामुळे त्याकरता योग्य ती प्रणाली विकसीत करण्याचं आवाहन नासाने जनतेला केलं आहे. 

हे ही वाचा : तब्बल 9 महिन्यानंतर सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर पृथ्वीवर परतले! पृथ्वीवर येताच त्यांना करावा लागणार अडचणींचा सामना

अंतराळ पर्यंटनाची तयारी

सामान्य माणसांनाही चंद्रावर घेऊन जाण्याचं मिशन नासाने नियोजित केलं आहे. अशा मोहिमांवेळी चंद्रावर आणखीन मोठ्या प्रमाणावर मानवी कचरा निर्माण होणार आहे. त्याशिवाय घनकचरा सुद्धा निर्माण होणार आहे. अशावेळी हा सगळा कचरा कशाप्रकारे साठवायचा, त्यावर कोणती प्रक्रिया करता येईल किंवा अवकाशात या कचऱ्याचा पुनर्वापर करता येण्याजोगी कोणती प्रक्रिया विकसीत करता येईल का? पृथ्वीवर जर हा कचरा परत आणायचा झाला तर तो कमीतकमी वजनात स्वरुपात आणता येईल का? अशा सगळ्या शक्यतांवर नासा आता काम करत आहे. 

आगामी काळातल्या आर्टेमिस मिशनच्या अंतर्गत अंतराळवीरांना चंद्रावर घेऊन जाण्याआधी मानवी विष्ठेचं व्यवस्थापन पर्यावरणाच्या साहाय्याने कसं करता येईल याचा नासा विचार करत आहे. 

अंतराळात मानवी कचऱ्याचं व्यवस्थापन कसं केलं जायचं?

नासाच्या मतानुसार, जेव्हा चार अंतराळवीरांचा गट वर्षभरासाठी अंतराळ मोहिमेसाठी जातो, तेव्हा ते जवळपास 2,500 किलो मानवी कचरा निर्माण करतात. यामध्ये मानवी विष्ठा, मूल विसर्जन आणि उलटी यासारखा कचरा येतो. पृथ्वीवर परत येताना हा सगळा कचरा परत आणण्यासाठी यानातील बहुतांशी जागा व्यापली जाऊ शकते. तसंच या कचऱ्यामुळे अंतराळवीरांच्या आरोग्यालाही धोका पोहोचू शकतो. 

सध्या अंतराळवीर हा कचरा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन तिथे या कचऱ्याचं विघटन करुन पिशव्यामध्ये बंद करतात. त्यानंतर ते  वेगवेगळ्या कंटेनरमध्ये ठेवून दिलं जातं. 

या प्रक्रियेनंतर हा कचरा एकतर पृथ्वीवर आणला जातो. किंवा अंतराळात पुन्हा प्रवेश करेपर्यंत ते स्पेसक्राफ्टवर ठेवलं जातं. मात्र हा उपाय पृथ्वीपासून जवळच्या कक्षेत असलेल्या मोहिमांमध्ये वापरता येतो. पृथ्वीच्या कक्षेपासून खूप दूर असलेल्या मोहिमांमध्ये हा उपाय वापरता येण्याजोगा नाही. 

कचरा पुनर्वापर प्रक्रियेमध्ये हा कचरा कमी होतो. तसंच सुरू असलेल्या मोहिमेमध्येच त्याचा आवश्येतकेनुसार वापर करता येईल अशा गोष्टीत रुपांतर करता येतं. 

कमी प्रमाणातला कचरा हा उच्च तापमानाच्या रिॲक्टरमध्ये टाकून त्याचं पाणी, ऑक्सीजन किंवा अन्य वायूमध्ये रुपांतर करता येईल. हे घटक पुन्हा वापरता येतील किंवा ते सुरक्षितरित्या वातावरणात मिसळून जातील. यामुळे अंतराळाला कोणताही धोका पोहचत नाही. 

हे ही वाचा : अंतराळात माणसाचं शरीर कसं बदलतं?

अंतराळवीरांचा कचरा कुठे जातो?

अंतराळ मोहिमांवेळी मानवी कचऱ्याचं काय होतं याविषयी सामान्यत: कोणाला कल्पना नसते. अंतराळात मानवी विष्ठा ‘फ्लश’ करण्यासाठी कोणती व्यवस्था नाही. त्यामुळे अन्य कचऱ्यासारखा हाही कचरा अंतराळ स्टेशनच्या बाहेर फेकला जातो. 2015च्या फॉर्ब्सच्या अहवालामध्ये नासाने स्पष्ट केलं आहे की, हा कचरा अंतराळ स्पेस स्टेशनमधून बाहेर फेकला जातो. त्यानंतर जेव्हा हा कचरा पृथ्वीच्या कक्षेत येतो तेव्हा पृथ्वीच्या कक्षेतल्या तापमानामध्ये हा कचरा जळून जातो. 

मात्र, आगामी मोहिमांमध्ये यामानवी कचऱ्याचंही पर्यावरणाच्या साहय्याने विघटन करण्यावर नासा भर देत आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

India - America : पाकिस्तानच्या संदर्भात दहशतवाद आणि काश्मीरच्या मुद्यावर भारताने आतापर्यंत कधीच कोणत्याच देशाची मध्यस्थी स्विकारली नाही आणि यापुढेही
Screen Addiction : भारतातील अनेक मुले दररोज 2 ते 4 तास स्क्रीनकडे बघतात. आणि कोरोनाच्या आधीचा काळापेक्षा आताचा हा स्क्रीन
Iran - Israel War : इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशा दरम्यान संघर्षाची ठिणगी पडली आहे. आखातातल्या या देशापासून आपण

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ