निसर्गाचे बीज जपणारे शिवशंकर चापुले

Shivshankar Chapule : ज्याप्रमाणे, माणसांचे भौगोलिक क्षेत्र ठरलेली आहेत तशीच झाडांची सुद्धा भौगोलिक क्षेत्र ठरली आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास करुन वृक्षलागवड केली पाहिजे. यासाठीच महाराष्ट्रात अधिवास असलेल्या वृक्षांचं जतन करण्यासाठी त्यांच्या बियांचं जतन करण्याचं काम शिवशंकर चापुले यांनी हाती घेतलं.
[gspeech type=button]

सेंद्रीय शेती आणि आपल्या काळ्या आईला जपण्यासाठी देशी वाण्यांचं जतन करणाऱ्या सीड वुमन राहीबाई पोपरे या आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. त्यांनी जसा सेंद्रिय शेती टिकवण्याचा ध्यास घेतला आहे तसाच निसर्गाला जपण्याचा ध्यास घेतला आहे तो लातुरच्या शिवशंकर चापुले यांनी. 

वैविध्य जपत वृक्षारोपण झालं पाहिजे

आपण पर्यावरणमित्र म्हणून वृक्षांची लागवड करतो. पण कोणत्या भौगोलिक क्षेत्रात कोणती झालं लावली पाहिजेत याची आपल्याला माहिती नसते. आणि ही माहिती घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षलागवड केली पाहिजे, हे आपल्या ध्यानीमनीही नसतं. त्यामुळे कुठेही कोणत्याही प्रकारचं झाड आपण लावतो. पण ज्याप्रमाणे, माणसांचे भौगोलिक क्षेत्र ठरलेली आहेत तशीच झाडांची सुद्धा भौगोलिक क्षेत्र ठरली आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास करुन वृक्षलागवड केली पाहिजे. यासाठीच महाराष्ट्रात अधिवास असलेल्या वृक्षांचं जतन करण्यासाठी त्यांच्या बियांचं जतन करण्याचं काम शिवशंकर चापुले यांनी हाती घेतलं. 

महाराष्ट्रातल्या मूळ वनस्पतीचं संवर्धन

महाराष्ट्रातल्या मूळ वनस्पतीचं संवर्धन करुन त्यांची लागवड करत राहिलो तर इथला आधिवास शाबूत राहिल याची शिवशंकर यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी 2020 पासून या वनस्पतींच्या बिया गोळा करायला सुरुवात केली. या पहिल्या वर्षी त्यांनी 25 वेगवेगळ्या वनस्पतींची बिया गोळा केल्या. यामध्ये काळा कुडा, रामवेद, दहिमन अशा वनस्पतींच्या बियांचा समावेश होता. गेल्या पाच वर्षांमध्ये शिवशंकर यांनी पश्चिम घाटातून 300 प्रकारच्या वनस्पतींच्या बिया गोळा केल्या.  

फळ, फुलं आणि औषधी वनस्पतींचा साठा

शिवशंकर यांनी हवेची गुणवत्ता सुधारणाऱ्या, आणि पर्यावरणीय संतुलन राखणाऱ्या स्थानिक झुडूप, वनस्पती आणि वेलींच्या बिया गोळा केल्या आहेत. यामध्ये हनुमान फळ (सीताफळाच्या जातीतलं फळ) याला इंग्रजीमध्ये सोसॉर्प किंवा ग्रॅव्हिओला असंही म्हटलं जातं. इपोमिया मॉर्निंग ग्लोरी फुल, दगडी केळी, फिकस मॉलिस (मऊ पानांचं अंजिर) या झाडांचा समावेश आहे. याशिवाय औषधी वनस्पती जसं की, शतावरी, गुंज (रोझरी पी), प्लम्बॅगो इंडिका, डायओस्पायरोस मोंटाना ( बॉम्बे इबोनी), देव कापस यांच्याही बिया गोळा केल्या आहेत. 

घरच्या घरीच सीड बँकेची निर्मिती

शिवशंकर यांनी बिया गोळा करायला सुरुवात केल्यानंतर लागलीच दुसऱ्या वर्षी त्यांच्याकडे 100 वनस्पतीच्या बिया जमल्या. या सगळ्या बिया सुरक्षित पद्धतीने जतन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरातच सीड बँक उभी केली.  काही बिया काचेच्या बरणीत तर काही बिया प्लास्टिकच्या बरणीत ठेवल्या. त्यापैकी प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवलेल्या बिया कीटकांपासून सुरक्षित राहाव्यात, त्यांची गुणवत्ता राखली जावी यासाठी या बरण्यांमध्ये भिमसेनी कापूरही ठेवला. भीमसेनी कापूर हा जीवजंतू, कीटक आणि आद्रेतेपासून बियांचं रक्षण करते.  

बियांच्या संकलनासाठी आणि प्रसारासाठी नोकरी सोडली

शिवशंकर यांनी इयत्ता बारावी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. ते एचपी गॅस एजन्सीमध्ये नोकरीला होते. लहानपणापासून जंगल, वनस्पती यांची त्यांना ओढ होती. त्यामुळे सुट्टीच्या दिवसात ते जवळच्या रेणापूरच्या जंगलात  स्वत:ला रमवून घेत असत. 

जसजशी वर्ष सरु लागली तसतशी पंचक्रोशीत शिवशंकर यांच्याकडे जमा होणाऱ्या बियांचा साठा वाढू लागला. आणि या सगळ्या उपक्रमाची माहितीही ज्यांना-त्यांना मिळू लागली. त्यामुळे या बिया घेण्यासाठी अनेकजण त्यांच्या घरी येऊ लागले. 

निसर्गाकडून या बिया मोफत मिळाल्या आहेत, त्यामुळे मी तरी त्या बिया लोकांना कशा काय विकू या तत्त्वामुळे ते सगळ्यांना मोफत बिया देत असत. बिया घेण्यासाठी लोकांचा ओघ वाढू लागल्यावर नोकरी आणि बिया संकलन करणं, त्यांनी निगा राखून ते जतन करणं अशी सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचण होऊ लागली. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ स्वत:ला या कामासाठी झोकून दिलं. 

हेही वाचा :‘अरण्यऋषी’ हरपले!

तुमच्या अवती-भोवती असलेल्याच वृक्षांची लागवड करा

अलिकडे घरात किंवा अंगणात (गार्डेन्समध्ये) वेगवेगळ्या फुलांची, फळांची आणि शोभेची झाडं लावली जातात. ही झाडं बहुतांशी वेळा आपल्या मातीतली नसतात. अशी झाडं आपल्या इकडच्या वातावरणात वाढतात. पण त्यामुळे पर्यावरणाचा अधिवास जपला जात नाही. या शोभेच्या किंवा अन्य ठिकाणच्या झाडांमुळे फुलपाखरांना वा कीटकांना मध मिळत नाही. ना पक्षी त्यावर आपली घरटी बांधत. यामुळे पर्यावरणातलं संतुलन ढासळतं. परिणामी अधिवास संपुष्ठात येत जातो. त्यामुळे जेव्हा कधी पण आपण वृक्ष लागवड करतो तेव्हा त्या – त्या भागातल्या मुळ वनस्पती झाडं कोणती आहेत याची माहिती घेऊन त्यानुसार वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. तरच आपण पर्यावरणाची खऱ्या अर्थाने काळजी घेऊ शकतो, हा विचार शिवशंकर आपल्या कृतीतून समाजाला पटवून देतात. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Latur Pattern : लातूर पॅटर्नअंतर्गत लातूरमध्ये विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिकवलं जातं, नेमकं हे लातूर पॅटर्न आहे तरी काय याविषयी श्रेष्ठ महाराष्ट्राने

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ