पाणी व्यवस्थापन भाग 2

Water Management : पर्माकल्चर पद्धतीने शेत डिझाईन करताना आपण मॅक्रो आणि मायक्रो क्लायमेट लक्षात घेतलं. ही माहिती कोणतं पीक कुठे लावायचं ह्यासाठी महत्वाची असते. पाणी उपलब्ध आहे, म्हणून कोणतंही पीक कुठेही घेणं योग्य नाही.
[gspeech type=button]

गेल्या भागात पाणी कसं कुठे साठवायचं ते पाहिलं आता त्याचा योग्य वापर कसा करायचा ते पाहूया.

पीकरचना

पर्माकल्चर पद्धतीने शेत डिझाईन करताना आपण मॅक्रो आणि मायक्रो क्लायमेट लक्षात घेतलं. ही माहिती कोणतं पीक कुठे लावायचं ह्यासाठी महत्वाची असते. पाणी उपलब्ध आहे, म्हणून कोणतंही पीक कुठेही घेणं योग्य नाही. उदा. कमी पावसाच्या प्रदेशात भूगर्भातील पाणी उपसून केळीसारखं प्रचंड पाणी लागणारं पीक घेतल्याने बोरवेल अधिकाधिक खोल जात आहेत. निव्वळ कालव्याचं पाणी आहे म्हणून दुष्काळी भागात ऊसासारखं पीक घेणं हे शाश्वत टिकणारं नाहीये. एक किलो उत्पादन घेण्यासाठी एखाद्या पिकाच्या पूर्ण हंगामामध्ये किती पाणी आवश्यक असतं, हे मोजणं उपयुक्त ठरु शकतं. उदा. एक किलो भात मिळवण्यासाठी 1500 ते 5000 लीटर पाणी लागतं. मग पंजाब हरयाणातील कालव्याच्या पाण्यावर बिनमोसमी भात पिकवणं आणि कोकणातल्या भातखाचरात पावसाच्या पाण्यावर जिथे एरवी इतर पीक शक्य नाही अशा ठिकाणी भात घेणं, हह्यातील कोणतं जास्त संयुक्तिक आहे ह्याचा विचार पीक ठरवताना केला पाहिजे.

सिंचन पद्धती निवडण्याचे निकषः

पिकाची निवड झाल्यावर योग्य पद्धतीने सिंचन करणे महत्वाचे असते. सिंचन व्यवस्था निवडतांना उपलब्ध पाणी, पीक, पुरेसा रूटझोन ओलिताखाली येणे, पृष्ठभागावरून कमीतकमी पाणी वाहणे, पाण्याचे कमीतकमी बाष्पीभवन होणे, योग्य वाफसा जास्तीतजास्त काळ टिकणे, व्यवस्थापनासाठी लागणारे मनुष्यबळ आणि इतर संसाधने ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.

सिंचनाच्या काही पद्धती पुढीलप्रमाणे.

तुषार सिंचनः

कमी ते साधारण उताराची जमीन असेल, सर्वत्र सारख्या प्रमाणात जास्तीतजास्त भागावर पाण्याची गरज असणाऱ्या पिकांसाठी तुषार सिंचन उपयुक्त आहे. गुंतवणूक जास्त असली तरी चालवण्यासाठी मनुष्यबळ कमी लागतं. सर्वत्र सारखं पाणी देता येतं हे काही फायदे.

ठिबक सिंचन

ह्यात थेट मुळांजवळ थेंब चैव पाणी सोडले जाते. आवश्यक तेवढेच पाणी देता येते. पाण्याची बचत होते. दूरवर आणि इतर पद्धतीने पाणी देता येणार नाही अशा ठिकाणीही पाणी पुरवता येते. गुंतवणूक जास्त परंतु चालवण्यासाठी खर्च कमी असतो. त्याचवेळी व्यवस्था कार्यरत ठेवण्यासाठी योग्य मेंटेनन्स वेळोवेळी करावा लागतो.

पाटाने पाणी देणे

ह्या पारंपरिक पध्दतीत सुरुवातीची गुंतवणूक अगदी कमी असली तरी मनुष्यबळाची गरज जास्त असते. योग्य नियोजन नसेल तर पाणी जास्त लागते, मातीची धूप आणि जमीन क्षारपड होण्याचा धोका असतो. नारळ, सुपारीसारख्या जास्त पाणी हव्या असणाऱ्या पिकांसाठी चांगला वापर होतो.

मातीखाली पाणी (Subsoil watering)

चर, स्वेल्स वगैरेंचा वापर करून मातीच्या पृष्ठभागाखालच्या घरात पाणी देणे शक्य असते. ह्याने पाण्याचं बाष्पीभवन होत नाही आणि अन्नाच्या शोधात वनस्पतींची मुळे खोलवर जातात आणि तिथे मुळांची सशक्त वाढ होते. पावसाळ्यात माती अडविण्याचे कामही होते.

चरात ओंडके काटक्या इत्यादी टाकून तिथे पाणी दिल्याने बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान कमी होते, पाणी खालच्या थरात दिले गेल्याने तिथे वनस्पतींची मुळे वाढतात.

पाणी दिल्यानंतर ते बाष्पीभवनामुळे उडून जाऊ नये म्हणून काळजी घेणेही महत्वाचे आहे. ह्यासाठी जमिनीवर आच्छादन असणे आवश्यक आहे. वाफसा धरून ठेवणे, पृष्ठभागाचे तापमान कमी करणे, तण नियंत्रण इत्यादी फायदे आच्छादनामुळे मिळतात.

जिवंत आच्छादन:

फूड फॉरेस्ट किंवा फळबागा जिथे मुख्य पिकाला स्पर्धा कमी असते अशा ठिकाणी जिवंत आच्छादन उपयुक्त ठरते. आच्छादनाच्या इतर फायद्यांसोबतच जमिनीचा पोत सुधारणे, अधिकचे उत्पादन, विविधता इत्यादी फायदे होतात.

सेंद्रिय आच्छादन:

लागवडीच्या सुरुवातीच्या काळात आणि जिथे मुख्य पिकाला स्पर्धा होऊ शकते अशा ठिकाणी भुसा, पालापाचोळा, नारळाची सोडणे, पेंढा अशा उपलब्ध सर्व सेंद्रिय पदार्थांचा वापर करून आच्छादन करता येते.

असेंद्रिय आच्छादन:

वरील दोन पर्याय संयुक्तिक नसतील तिथे प्लॅस्टिक मल्चिंग पेपरसारखे इतर पर्यायही आच्छादनासाठी वापरता येतात. ह्याचे यांत्रिकीकरण, वापरातली सहजता, सहज पुनर्वापर इत्यादी फायदे मिळतात.

पाण्याचा पुनर्वापर आणि प्रक्रिया

पृथ्वीची काळजी (earth care) हे पर्माकल्चरचं एक महत्वाचं मूल्य. पाण्याचा सुयोग्य आणि जास्तीतजास्त वापर ह्यात अपेक्षित आहेच. पण वापरून झालेलं पाणी आपल्या व्यवस्थेतून बाहेर जाण्यापूर्वी त्यावर योग्य प्रक्रिया होऊन ते व्यवस्थित निसर्गात परत जाईल, ह्यासाठी पाण्यावर योग्य प्रक्रिया करण्यालाही महत्व आहे.

उदा. सिंचनाच्या पाण्याला तलावात वाट करून देणे व त्यात मासे व बदके पाळणे. मत्स्यपालनासाठी वापरलेल्या पाण्यावर अळूसारख्या वनस्पती घेतल्यानंतर ते पाणी तलावात गोळा करून तिथे वेटलँड तयार करणे.

ग्रे-वॉटर ट्रीटमेंट:

अंघोळीसाठी, कपडे भांडी वगैरे धुण्यासाठी जे पाणी वापरलं जातं त्याला ग्रे वॉटर म्हणतात. त्यात जर रासायनिक घटक मिसळले नसतील, तर फारच उत्तम पण रासायनिक घटक असले तरी त्यावर योग्य प्रक्रिया करून ते जमिनीत सोडता येते. आम्ही आमच्या कॉटेजेसमधील आणि किचनमधील पाण्यावर रीड बेडची सिस्टीम वापरून ट्रीटमेंट करतो. ह्यात पाणी एका भोकं पाडलेल्या पाईपच्या साहाय्याने पक्के बांधकाम केलेल्या टॅन्कमध्ये सोडले जाते. टँकचा आकार त्यात येऊ शकणाऱ्या पाण्यावर अवलंबून असतो. त्यावर वेगवेगळ्या आकाराचे गोटे आणि खडीचे थर देण्यात येतात. त्यावर अळू, केळी, ब्रूम ग्रास, कर्दळी, हेलिकोनिया सारख्या वनस्पती वाढवण्यात येतात. वनस्पतींची मुळे आणि जीवाणूंद्वारे आलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन पानांवाटे उत्सर्जन होतं व काही पाणी जमीनीत मुरतं.

ग्रे-वॉटर ट्रीटमेंटसाठी बनवलेली रीडबेड सिस्टीम

ब्लॅक वॉटर:

ब्लॅक वॉटर म्हणजे संडासमधून बाहेर पडणारं पाणी. ह्यात मानवी विष्ठेत वाढणारे घातक विषाणू असण्याची शक्यता असते त्यामुळे त्यावर जास्त काळजीपूर्वक प्रक्रिया करण्याची गरज असते. असे पाणी सेप्टिक टॅन्कमध्ये घेऊन, वेगवेगळ्या चेंबर्समध्ये प्राणवायू विरहित व प्राणवायूत वाढणाऱ्या जीवाणूंची त्यावर प्रक्रिया करण्यात येते व त्यानंतर ते ग्रे वॉटरसाठी असणाऱ्या रीड बेडमध्ये सोडण्यात येते. अशाप्रकारे प्रक्रिया झाल्यानंतरही पाणी पिण्याच्या पाण्याजवळ जाणार नाही ह्याची काळजी घेतली जाते.

कंपोस्ट संडास:

पाण्याचा कमीतकमी वापर व मानवी विष्ठेचं खतात रूपांतर करणारी आणखी एक स्वस्त आणि मस्त पद्धत म्हणजे कंपोस्ट टॉयलेट. वापर झाल्यानंतर भुसा किंवा पालापाचोळा झाकण्यासाठी करता येतो. प्राणवायू खेळता राहिल्याने घातक विषाणू वाढत नाहीत व दुर्गंधही येत नाही. फक्त पुराचं पाणी आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत कंपोस्ट टॉयलेटच्या थेट संपर्कात येणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते.

2 Comments

  • Kishore Ahire

    Fantastic article

  • अमित

    👍👌 या लेखात तुम्ही पाणी बचत आणि व्यवस्थापनाचे जवळपास सर्व मुद्दे मांडले आहेत. माझ्या कर्जत भागात बांधकाम आणि रिसॉर्ट्सच्या वाढत्या विकासामुळे भूजल पातळी अधिक वेगाने खालावत आहे. माझ्या ठिकाणी उत्कृष्ट छतावरील पावसाच्या पाण्याचे संकलन केले असले तरी भूजल पातळी पूर्वीपेक्षा जलद गळती होत आहे. यावर उपाय म्हणून मी EPDM रबरने अस्तर केलेले लहान कृत्रिम तलाव तयार करून पाणी साठवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा फक्त तात्पुरता उपाय आहे. प्रचंड कोरड्या हवामानामुळे परिस्थिती भीतीदायक आहे, आणि माझ्या भाजीपाला पिकांना वाचवण्यासाठी मी मल्चिंग आणि अंशतः सावलीचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचा लेख खूपच शैक्षणिक आहे, आणि लोकांना पाणी ही संसाधने मर्यादित आहेत हे लक्षात येईल अशी आशा आहे, कारण ती सौर उर्जेपेक्षाही अधिक मर्यादित आहे. विकासाच्या नावाखाली मोठे सोलर फार्म बनविणे कितपत योग्य आहे माहीत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 Responses

  1. 👍👌 या लेखात तुम्ही पाणी बचत आणि व्यवस्थापनाचे जवळपास सर्व मुद्दे मांडले आहेत. माझ्या कर्जत भागात बांधकाम आणि रिसॉर्ट्सच्या वाढत्या विकासामुळे भूजल पातळी अधिक वेगाने खालावत आहे. माझ्या ठिकाणी उत्कृष्ट छतावरील पावसाच्या पाण्याचे संकलन केले असले तरी भूजल पातळी पूर्वीपेक्षा जलद गळती होत आहे. यावर उपाय म्हणून मी EPDM रबरने अस्तर केलेले लहान कृत्रिम तलाव तयार करून पाणी साठवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा फक्त तात्पुरता उपाय आहे. प्रचंड कोरड्या हवामानामुळे परिस्थिती भीतीदायक आहे, आणि माझ्या भाजीपाला पिकांना वाचवण्यासाठी मी मल्चिंग आणि अंशतः सावलीचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचा लेख खूपच शैक्षणिक आहे, आणि लोकांना पाणी ही संसाधने मर्यादित आहेत हे लक्षात येईल अशी आशा आहे, कारण ती सौर उर्जेपेक्षाही अधिक मर्यादित आहे. विकासाच्या नावाखाली मोठे सोलर फार्म बनविणे कितपत योग्य आहे माहीत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT
आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ