सर्व सुख विठ्ठला पायी, जाणे अहिल्याबाई

Chandrabhagechya Tiri : आपल्या दानधर्मासाठी, भारतभर अनेक मंदिरांच्या केलेल्या उभारणीसाठी आणि वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना केलेल्या भरीव मदतीसाठी आपण महाराणी अहिल्याबाईंना ओळखतो. त्यांच्या दातृत्वाचं प्रतीक असलेला एक भव्य वाडा पंढरपुरात आपल्याला पाहायला मिळतो. 
[gspeech type=button]

आपल्या दानधर्मासाठी, भारतभर अनेक मंदिरांच्या केलेल्या उभारणीसाठी आणि वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना केलेल्या भरीव मदतीसाठी आपण महाराणी अहिल्याबाईंना ओळखतो. त्यांच्या दातृत्वाचं प्रतीक असलेला एक भव्य वाडा पंढरपुरात आपल्याला पाहायला मिळतो. 

होळकर वाडा

विठ्ठल मंदिराकडून चंद्रभागेकडे जाताना लागणाऱ्या चौकाच्या डाव्या बाजूला हा वाडा आहे. होळकरांचा हा वाडा साधारणपणे दोन एकर जागेमध्ये बांधलेला आहे. सन 1754 मध्ये या वाड्याच्या पायाभरणीला प्रारंभ झाला. तब्बल 13 वर्ष या वाड्याचं बांधकाम सुरू होतं. हा वाडा दुमजली असून सध्या वरच्या मजल्यावरचा काही भाग ढासळला आहे. बाकीचं सगळं बांधकाम चांगल्या स्थितीत आहे. या वाड्याची समोरील भाग साधारणपणे 600 फूट लांब तर रुंदी 300 फूट इतका भव्य आहे.  

                                                 होळकर वाड्याची आतली बाजु

बांधकामासाठी मध्यप्रदेशातून सागाचं लाकूड

या वाड्याच्या बांधकामासाठी लागणारं सागाचं लाकूड मध्यप्रदेशमधील जंगलामधून आणल्याचं सांगितलं जातं. ही  लाकडं नर्मदा नदीत टाकून नंतर ती गुजरात जवळच्या समुद्रात यायची. गुजरातवरुन रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचलेली ही लाकडे पाण्यातून बाहेर काढून हत्तीच्या पाठीवर टाकून पंढरपूरमध्ये आणली गेली, असं सांगितलं जातं.  अशाप्रकारे लाकडाचं सिझनिंग उत्तमप्रकारे झालं.

वाड्यातील आतील बाजुला सागाच्या लाकडाने केलेलं सुशोभिकरण

वाड्याच्या संपूर्ण बांधकामासाठी चुना वापरला आहे. चुना तयार करीत असताना भोकरीचे बी, पिंपळाचा डिंक, बिब्याचे द्रावण, कापूस अशा सगळ्या साहित्याचा वापर केला आहे. चुना चांगल्या प्रतीचा तयार व्हावा म्हणून खूप घोटला जात होता. या चुन्याचा दर्जा तपासण्यासाठी अभिनव पद्धत वापरली होती. मोठ्या लोंखडी काहिलीमध्ये पाणी भरून त्यात उंचावरून चुन्याचा गोळा टाकला जात असे. तो गोळा फुटला नाही तर पक्का चुना तयार झाला आहे, असं समजलं जायचं.  

पाडव्याच्या दिवशी वाड्याचा वास्तूशांती समारंभ

वाड्याचा वास्तूशांती समारंभ कार्यक्रम चैत्र शुद्ध प्रतिपदा(पाडवा), सन 1767 ला झाला. या वाडयाच्या वास्तूशांतीच्या वेळी महाराणी अहिल्यादेवी होळकर स्वतः पंढरपूरमध्ये होत्या. या समारंभास अनेक सरदार व छत्रपतीही उपस्थित होते.  

शिवमंदिराऐवजी राममंदिराची उभारणी

वाड्याच्या दक्षिणेला राममंदिर आहे. अहिल्याबाईने भारतभर शिव मंदिरांची स्थापना केली.  मग पंढरपुरात राम मंदिर का असा प्रश्न आपल्याला पडतो.  त्याविषयी असे सांगितले जाते की, या वाड्याचं बांधकाम चालू असताना आणि शिव मंदिराची रचना चालू असताना बांधकामात अचानक दास मारुतीची एक मूर्ती सापडली.  ही घटना अहिल्याबाईंना त्यांच्या दिवाणजींनी कळवली.  यामागे ईश्वरी संकेत आहे असे वाटून अहिल्याबाईंनी शिवमंदिराऐवजी राम मंदिराची स्थापना केली.  ही दास मारुतीची मूर्ती देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे.  त्याच्या कानात मकर कुंडले आहेत व हात देखील श्री विठ्ठल मूर्ती प्रमाणेच ठेवलेले आहेत.  या राम मंदिरात एक शिवपिंड आहे. या मंदिरातील शिवपिंडीवर  12  शिवलिंगं  आहेत. विठोबा आणि रामाच्या पूजेत तुळशीपत्राची आवश्यकता असल्याने अहिल्याबाईंच्या आज्ञेने पंचमुखी मारूतीजवळ तुळशीबागही उभारण्यात आली होती. 

वाड्याची भव्यता 

वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार सुमारे 22-25 फूट उंचीचे आहे. दगडी बांधकामाच्या वरील भागात मराठी पद्धतीतील विटांचे नक्षीकाम आहे. मोठ्या जाडीच्या सागवानी चौकटीत, त्याही एकात एक ३ असे मोठे लाकडी द्वार आहे. आत दोन बाजू देवड्या आहेत. दारावर होळकरांचे निशाण लावण्याची व्यवस्था असलेली दिसते. पूर्वी तेथे निशाण असायचे हल्ली मात्र दिसत नाही. तळमजल्यात 11 आणि वरच्या मजल्यावर 5 अशा एकूण 16 खोल्या या वाड्यात आहेत.वाड्याला भव्य, उंच आणि दणकट अशी तटबंदी आहे. वाड्यात पैस, दिवाणघराची गाद्या तक्क्यांची बैठक, गरजेनुसारच्या लहानमोठ्या खोल्या, प्रशस्त स्वयंपाकघर, मोठाली तळघरे, गोशाळा, सदावर्त, घोड्याची पागा, बग्गी, पालखी अशा साऱ्या गोष्टी होत्या. 

 हे ही वाचा : पंढरी नगरीचे भूषण नगर वाचन मंदिर

वाड्यातील भुयारी गटार योजना

या वाड्याचे  अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या वाड्याला असलेली भुयारी गटार योजना.  ऐन पावसाळ्यातदेखील वाड्यात कोठेही पाणी साचत नाही आणि पूर आला तरी  पाणी उलटे वाड्यात येत नाही. वाड्यातल्या कुठल्याही स्वच्छतागृहाला किंवा मोरीला  कधीही दुर्गंधी येत नाही. 

1966 पर्यंत या वाड्यात अन्नधर्म

सन 1767 ते 1966 पर्यंत या वाड्यात अन्नधर्म व दानधर्म चालत होता. त्याचा खर्च संस्थान देत होते. अन्नछत्रात गोसावी, बैरागी, आंधळे, पांगळे व गरीब लोकांकरता अन्नछत्र होते. आजही चंद्रभागा नदीच्या तीरावर  सांस्कृतिक समन्वयाचे ठिकाण म्हणून हा वाडा सुस्थितीत उभा आहे.

पंढरपुरात आल्यानंतर अवश्य पाहिले पाहिजे असे हे एक ठिकाण आहे.  पंढरपुरात सध्या संभाव्य रस्ता रुंदीकरणाची चर्चा आहे.  हे रस्ता रुंदीकरण करताना पंढरपुरात या वाड्यासारख्या असणाऱ्या सर्व  सांस्कृतिक  पाऊलखुणा  आवर्जून  जपल्या गेल्या पाहिजेत. 

माहिती सौजन्य:  आदित्य फत्तेपूरकर, आशुतोष बडवे पंढरपूर. 

7 Comments

  • Kamal Tonde

    खुप छान माहिती मिळाली

  • Sandhya Gavade

    खूपच छान माहिती मिळाली. खरोखर प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी हा वाडा आतून पाहणे आवश्यक आहे.

  • Narendra Trimbak Vaidya

    ‘पुण्यश्लोक’ व्यक्तित्व, त्याच तोलाची भव्य वास्तू आणि लिहिलंय पण भारी ..

  • माधवी वर्तक

    आम्ही डिसेंबर मध्ये पंढरपूरला आलो होतो तेंव्हा बाहेरील पाटीवर होळकर वाडा असे वाचले पण बाहेरुन त्या वाड्याची भव्यता लक्षात येत नाही.
    सामान्यांना हा वाडा आतून बघता येतो का?
    शुभागीताई छान माहिती दिलीत.

  • डाॅ. अ. भा. हरके

    पंढरपूरच्या आणखी काही ऐतिहासिक खाणाखुणा ! अर्थात, शुभांगी चा ब्लॉग माहितीपूर्ण असणार हे ओघाने आलेच!

  • Ashutosh Badave

    सुंदर लिखाण

  • Prajakta khadilkar

    ha wada baherunch pahila ahe
    Pandharpur madhil vaibhavshali vastu🙏👌

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

7 Responses

  1. पंढरपूरच्या आणखी काही ऐतिहासिक खाणाखुणा ! अर्थात, शुभांगी चा ब्लॉग माहितीपूर्ण असणार हे ओघाने आलेच!

  2. आम्ही डिसेंबर मध्ये पंढरपूरला आलो होतो तेंव्हा बाहेरील पाटीवर होळकर वाडा असे वाचले पण बाहेरुन त्या वाड्याची भव्यता लक्षात येत नाही.
    सामान्यांना हा वाडा आतून बघता येतो का?
    शुभागीताई छान माहिती दिलीत.

  3. ‘पुण्यश्लोक’ व्यक्तित्व, त्याच तोलाची भव्य वास्तू आणि लिहिलंय पण भारी ..

  4. खूपच छान माहिती मिळाली. खरोखर प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी हा वाडा आतून पाहणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Vedh Shivkalacha : दुर्गबांधणीचे शास्त्र आपल्या देशाला फार प्राचीन काळापासून माहिती होतं. दुर्गाचे विविध प्रकार कोणते? याचा शिवकाळात देखील बारकाईने
National Milk Day : राष्ट्रीय दूध दिनानिमित्त भारतातल्या दुग्ध क्रांतीविषयक विशेष लेख.
Vedh Shivkalacha : कोणत्याही युद्धाचे यश हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ