महाकुंभ मेळाव्यात भारतीय पर्यटन विकास महामंडळाचे लक्झरी कॅम्प

Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळाव्यामध्ये पर्यटकांची खास व्यवस्था करण्यासाठी भारतीय पर्यटन विकास महामंडळाने दोन लक्झरी कॅम्पची व्यवस्था केली आहे. देशभरातून आणि परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी ही विशेष सुविधा असणार आहे.
[gspeech type=button]

महाकुंभ मेळाव्यामध्ये पर्यटकांची खास व्यवस्था करण्यासाठी भारतीय पर्यटन विकास महामंडळाने दोन लक्झरी कॅम्पची व्यवस्था केली आहे. देशभरातून आणि परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी ही विशेष सुविधा असणार आहे.

योग, ध्यानसाधना उपक्रमांचे आयोजन

पर्यटकांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह त्यांच्यासाठी योग, ध्यानसाधना अशा विविध उपक्रमांचंसुद्धा आयोजन पर्यटन विकास महामंडळाने केलं आहे. यामध्ये भारतीय ऐतिहासिक संस्कृतीचं दर्शन, भारतीय खाद्यसंस्कृती, भारतीय परंपरेतील विविध पैलू अशा अनेक माहितीपूर्ण गोष्टीचं दर्शन घडवण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने विशेष तयारी केली आहे.

अविस्मरणीय मेळाव्याची अनुभूती

महाकुंभ हा आध्यात्मिक मेळावा आहे. या मेळाव्यामध्ये भाविकांना सुरक्षितपणे आणि कोणत्याही सोयी-सुविधांच्या गैरसोयीमध्ये राहावं लागू नये म्हणून भारतीय पर्यटन विकास महामंडळ प्रयत्नशील आहे. या मेळाव्यामधून भाविकांना अविस्मरणीय अनुभव मिळावा म्हणून पर्यटन विकास महामंडळ या उत्सवाला पूरक उपक्रमांचं आयोजन करीत आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय पर्यटन विभागाचे संयुक्त सचिव एम.आर.सिनरेम यांनी दिली आहे.

कसा असणार पर्यटन महामंडळाचा लक्झरी कॅम्प

पर्यटन महामंडळाचा लक्झरी कॅम्प हा व्हीआयपी क्षेत्राच्या बाजूला असणार आहे. या कॅम्पमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सगळ्या सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. यामध्ये सुपर प्रिमियम सूट, प्रिमियम, डिलक्स आमि स्टॅडर्ड अशा वेगवेगळ्या स्वरुपातील सूट असणार आहेत. पर्यटक त्यांच्या बजेटनुसार हा सूट बुक करु शकतात.

या कॅम्पमध्ये विमानतळापासून प्रयागराज मध्ये ये-जा करण्याची सुविधा, मेळाव्याच्या संपूर्ण परिसरात माहितीपूर्ण टूर, वाराणसी आणि अयोध्या दर्शन, परकीय चलन विनिमय केंद्र या सुविधाही पुरवल्या जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वारंवर चालणारी क्रीया म्हणजे वारी. या वारीला हजारो वर्षांची परंपरा आहे. साक्षात भगवान शंकर हे पहिले वारकरी मानले जातात. पण
Pandharpur Wari : वर्षातून चारदा होणाऱ्या वाऱ्या हे पंढरपुरचे वैशिष्ट्य. शिवाय महिन्याच्या एकादशीला येणारे भाविक वेगळेच. वर्षभराचा विचार केला तर
Vedh Shivkalacha : काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की भारताने सिंधु करार स्थगित केला आहे आणि पाकिस्तानची वेगळ्या प्रकारे नाकाबंदी केली

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ