‘ऑपरेशन फ्लड’ – जगात दबदबा निर्माण करणारा भारताचा दुग्ध उत्पादन प्रकल्प

National Milk Day : राष्ट्रीय दूध दिनानिमित्त भारतातल्या दुग्ध क्रांतीविषयक विशेष लेख.
[gspeech type=button]

‘राष्ट्रीय दूध दिवसा’चा इतिहास

दुधाचे सर्व पैलू साजरे करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेद्वारे (FAO) दरवर्षी 01 जून रोजी ‘जागतिक दूध दिवस’ साजरा केला जातो. पहिला जागतिक दूध दिवस 2001 मध्ये साजरा करण्यात आला. हा दिवस म्हणजे दुग्ध व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याची आणि दूध व दुग्ध उद्योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचा प्रचार व प्रसार करण्याची संधी प्रदान करतो. अनेक देशांनी आपापल्या ठिकाणी दुग्ध उत्पादनाविषयीचे कार्यक्रम करण्यासाठी हाच दिवस निवडला आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्सवांना अतिरिक्त महत्त्व दिले जाते आणि दूध हे जागतिक पातळीवरील एक महत्त्वाचे अन्न आहे, हे दर्शवले जाते.

‘ऑपरेशन फ्लड’ आणि दूध ग्रीड 

या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये, NDDB (National Dairy Development Board), IDA (Indian Dairy Association) आणि 22 राज्य-स्तरीय दूध महासंघांनी 26 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या श्वेत-क्रांतीचे जनक दिवंगत डॉ वर्गीस कुरियन (2021 – 2012) यांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी मिळून ‘राष्ट्रीय दूध दिवस’ साजरा करण्यास सुरुवात केली. यापूर्वी, 1970 मध्ये, NDDB ने देशभरात ‘दूध ग्रीड’ स्थापन करण्यासाठी ‘ऑपरेशन फ्लड’, राष्ट्रीय विकास प्रकल्प सुरू केला. त्यावेळी NDDB चे अध्यक्ष असलेले डॉ कुरियन यांनी दुग्ध उत्पादन क्षेत्राला प्रगतिपथावर नेण्याच्या आपल्या प्रबळ संकल्पाच्या जोरावर सहकार क्षेत्रात व्यावसायिक व्यवस्थापन कौशल्यांचा अंतर्भाव केला. धवल-क्रांती किंवा श्वेत-क्रांती घडवून आणणारा ‘ऑपरेशन फ्लड’ हा भारताला जागतिक स्तरावर सर्वात मोठा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठादार बनवणारा जगातील सर्वात मोठा प्रकल्प होता.

भारतीय धवल क्रांतीचे जनक डॉ. कुरियन यांचे योगदान:

  • Gujarat Co-operative Milk Marketing Federation Ltd (GCMMF) ची स्थापना, जी नंतर ‘अमूल’ बनली.
  •  देशभरात आणि अन्य देशात पथदर्शी ठरलेल्या ‘अमूल मॉडेल’ची निर्मिती.
  • श्वेतक्रांतीचे नेतृत्व करणे, त्याद्वारे दूध उत्पादन वाढवणे.
  • देशव्यापी ‘दूध ग्रिड’ तयार करणे, शेतकऱ्यांना दुधाचा रास्त भाव मिळण्यासाठी प्रयत्न करणे.
  • ग्रामीण व्यवस्थापनाचे शिक्षण देण्यासाठी गुजरात मधील आणंद येथे IRMA (Institute of Rural Management) ची स्थापना.
  • ‘अमूल मॉडेल’ च्या धर्तीवर फळे व भाजीपाला आणि तेलबिया पिकांमध्ये शेतकाऱ्यांकडून थेट खरेदी आणि प्रक्रिया उद्योग साखळी स्थापन करणे. खाद्य तेलाच्या ‘धारा’ ब्रॅंडची निर्मिती.
हेही वाचा : भारतीय दुग्ध उत्पादन संशोधन आणि आव्हाने

ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती सुधारणे आणि घरगुती वापरासाठी दूध उत्पादन वाढवणे

डॉ कुरियन यांच्या नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन फ्लड’चे दुहेरी उद्दिष्ट ठरवण्यात आले. पहिले उद्दिष्ट होते घरगुती वापरासाठी दुधाचे उत्पादन वाढवणे आणि दुसरे होते ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती सुधारणे. अशाप्रकारे, सर्वसामान्य शेतकरी दुधाचे व्यापारी करत असलेल्या गैरप्रकारांशी लढा देऊ शकला, आणि देशाला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादकांपैकी एक म्हणून जागतिक स्तरावर पुढे नेऊ शकला. तसेच दरडोई दुधाची उपलब्धता वाढल्यामुळे नागरिकांना चांगले पोषणमूल्य असलेले आणि स्वच्छ दूध उपलब्ध करून देण्यात आले.

भारतीय धवलक्रांतीचे जनक 

भारतीय शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे जीवन उंचावणाऱ्या अशा असाधारण कामगिरीसाठी डॉ वर्गीस कुरियन यांना भारतात पद्मश्री (1965), पद्मभूषण (1966), पद्मविभूषण (1999) या पुरस्कारांनी, आणि जागतिक स्तरावर अत्यंत सन्मानाचे समजले जाणारे रॅमेन मॅगसेसे पुरस्कार (1963), वर्ल्ड फूड प्राइज (1989) व संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) वतीने ‘कर्मवीर चक्र अवॉर्ड’ (2011) हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

राष्ट्रीय दूध दिवसाचे महत्त्व

अभूतपूर्व प्रमाणात दुधाचे उत्पादन करून, ‘ऑपरेशन फ्लड’ने भारताच्या दुग्ध उद्योगाला देशातील सर्वात मोठ्या स्वयं-निर्भर क्षेत्रांपैकी एक म्हणून स्थान दिले. त्यामुळेच भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्र, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) सुमारे 4% आणि राष्ट्रीय कृषी उत्पन्नाच्या सुमारे 25% योगदान देऊ शकत आहे. दुग्धोत्पादनातील सुवर्ण मानक (Gold Standard) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘अमूल’ या जगप्रसिद्ध ब्रँडची निर्मिती केली असली तरी तेवढयावरच डॉ वर्गीस कुरियन यांचा प्रभाव संपत नाही. राष्ट्रीय दूध दिनानिमित्त, देश डॉ कुरियन यांच्या कठोर परिश्रमांचे स्मरण करतो, जनतेला दुधाच्या सेवनाच्या फायद्यांविषयी माहिती देतो. दुग्धव्यवसाय तज्ञांना दुग्धव्यवसाय विकासाद्वारे स्वावलंबी देश घडवायचा होता आणि त्यांचे हे स्वप्न देशाच्या दुग्धव्यवसाय क्षेत्रात आजही प्रतिध्वनीत होत आहे.

हे ही वाचा : दुधासंबंधित समज – गैरसमज

‘राष्ट्रीय दूध दिवस’ कसा साजरा केला जातो?

जागतिक पातळीवर दूध उत्पादनात भारत अग्रेसर आहे आणि जागतिक बाजारपेठेत आपला ठसा उमटवत आहे. राष्ट्रीय दूध दिवसाच्या निमित्ताने, देशातील सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी, देशी गायी / म्हशी पालन करणारे शेतकरी, सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन (Artificial Insemination) करणारे तंत्रज्ञ आणि सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था / दूध उत्पादक कंपनी / डेअरी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन (Dairy FPOs) या तीन श्रेणी अंतर्गत उत्तम कार्य करणाऱ्या विजेत्यांना ‘राष्ट्रीय गोपाल रत्न’ पुरस्कार प्रदान केले जातात. हे पुरस्कार प्रदान करण्यामागची उद्दिष्टे अशी आहेत – शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने दुभत्या जनावरांच्या देशी जातींची उत्पादकता वाढविण्यास प्रवृत्त करणे, राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM) अंतर्गत 100% कृत्रिम रेतन (AI – Artificial Insemination) करण्यासाठी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना प्रवृत्त करणे, सहकारी व दूध उत्पादक कंपन्यांना वाढीसाठी प्रवृत्त करणे आणि स्पर्धात्मक भावना निर्माण करणे. प्रशस्तिपत्रक, स्मृतिचिन्ह व रुपये 2 ते 5 लाखांपर्यंत रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप असते.

राष्ट्रीय दूध दिवस 2024

जागतिक दूध दिनाची 2024 या वर्षासाठीची थीम आहे ‘स्वस्थ भविष्याच्या दिशेने वाटचाल: आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी दुधाचे पौष्टिक लाभ सुनिश्चित करणे’. ही थीम ‘दर्जेदार पोषण प्रदान करण्यासाठी आणि संतुलित आहारामध्ये योगदान देण्यासाठी दुग्धव्यवसायाचे महत्त्व’ यावर लक्ष केंद्रित करते. दरवर्षी 26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध दिवस डॉ वर्गीस कुरियन यांनी आपल्या देशाच्या विकासात दिलेल्या महत्त्वाच्या योगदानाची आठवण जपतो आणि भविष्यात मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देतो.

भारतीय दुग्ध उत्पादन क्षेत्रासमोर असलेली आव्हाने आणि भविष्याची दिशा याबद्दल पुढील भागात जाणून घेऊ. 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Vedh Shivkalacha : दुर्गबांधणीचे शास्त्र आपल्या देशाला फार प्राचीन काळापासून माहिती होतं. दुर्गाचे विविध प्रकार कोणते? याचा शिवकाळात देखील बारकाईने
Vedh Shivkalacha : कोणत्याही युद्धाचे यश हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे
छत्रपती शिवराय: इ. स. 640 नंतर तत्कालीन हिंदुस्थानवर मुस्लिम आक्रमणे सुरू झाली. धर्मविस्तार आणि इथल्या संपत्तीची लूट इतकाच उद्देश घेऊन

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ