तब्बल 9 महिन्यानंतर सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर पृथ्वीवर परतले! पृथ्वीवर येताच त्यांना करावा लागणार अडचणींचा सामना

Sunita Williams & Barry Wilmore : नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर हे तब्बल 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार आहेत. अंतराळात कमी गुरुत्वाकर्षण असल्यामुळे दोन्ही अंतराळवीरांच्या शरिरामध्ये नानाविध बदल झाल्याची शक्यता आहे. या बदलांमुळे त्यांना पृथ्वीवर पायावर उभं राहताना सुद्धा अडचणी येऊ शकतात. यासह अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
[gspeech type=button]

नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर हे तब्बल 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत. जून 2024 साली सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये 8 दिवसाच्या मिशनसाठी गेले होते. तिकडून परतताना त्यांच्या स्पेसक्राफ्टमध्ये बिघाड झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांना परत पृथ्वीवर परतणं अशक्य झालं. 

अखेर दोन दिवसापूर्वी स्पेस एक्स कडून पाठवलेल्या ड्रॅगन क्राफ्टमधून या दोन्ही अंतराळवीरांना परत आणलं जाणार आहे. अमेरिकेच्या वेळेनुसार हे ड्रॅगनक्राफ्ट 18 मार्चला पृथ्वीवर उतरणार आहे. तर भारतीय वेळेनुसार 19 मार्चला हे ड्रॅगनक्राफ्ट अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथे उतरेल. 

या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर सुखरुप आणत असल्याबद्दल अख्ख जग आनंदी आहे. पण पृथ्वीवर येताच सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर यांना खूप अडचणी येणार आहेत. नऊ महिने अंतराळात राहिल्यामुळे या दोन्ही अंतराळवीरांना चालण्यासाठी अडचणी येऊ शकतात. त्यांच्या दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. याशिवाय त्यांना या वातावरणात सरमिसळून जाण्यासाठी वेळ लागू शकतो. याकाळात त्यांना विविध आजार होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. 

अंतराळवीरांना चालताना होणार त्रास

नऊ महिन्यांनी अंतराळातून परतल्यानंतर या दोन्ही अंतराळवीरांना चालताना अडचणी येऊ शकतात. लहान बाळांचे पाय जसे लटपटतात तसे सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर यांचे पाय जमिनीवर ठेवताच लटपटू शकतात. 

नऊ महिने अंतराळात राहिल्यामुळे त्यांच्या पायाच्या तळव्याची त्वचा ही लहान बाळाच्या त्वचेसारखी खूप मुलायम होऊन ती निघालेली असू शकते. यामुळे त्यांचे पाय हे जास्त संवेदनशील झालेले असू शकतात. कारण नऊ महिने अंतराळात राहिल्यावर ते हवेत तरंगत असतात. त्यांना तिथे चालता येत नाही. त्यांच्या तळव्यावरचा जाड थर निघून जातो. त्यामुळे पृथ्वीवर परतल्यावर त्यांना चालताना अडचणी येतात, अशी माहिती नासा अंतराळवीर लेरॉय चियाओ यांनी दिली. 

अंतराळातल्या दीर्घकाळ वास्तव्यामुळे या अंतराळवीरांचे स्नायूसुद्धा कमकुवत झालेले असू शकतात. त्यामुळेही त्यांना चालण्यासाठी अडचणी येतील. संशोधकांच्या अभ्यासानुसार अंतराळामध्ये माणसांच्या अंगावरचं मांस एका महिन्यात एक टक्क्याने कमी होत जातं. यानुसार, सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर यांच्या अंगावरच 9 टक्के मांस कमी झालं असणार. त्यामुळे त्यांची हाडे ही कमकुवत झाल्यानं त्यांना फ्रॅक्चरही लगेचच होऊ शकतात.

ज्याठिकाणी गुरुत्वाकर्षण कमी असते तिकडे माणसांचे स्नायू विशेषत: कमरे खालच्या शरीराचे स्नायू कमकुवत होत जातात. पर्यायी अंतराळातून परत आल्यावर पृथ्वीवरच्या गुरुत्वाकर्षणशी जुळवून घेऊन उभं राहणं, चालणं शरीराचं संतुलन राखणं अशा सगळ्या क्रिया करताना अडचणी येतात, अशी माहिती बँगलोरचे डॉ. रघु नागाराज यांनी दिली.

दृष्टी हरपणे, मेंदूतील पाणीपातळी वाढणे

कमकुवत स्नायूंसह या दोन्ही अंतराळवीरांना दृष्टीहिनतेचा सामना करावा लागू शकतो. दीर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे त्यांना स्पेसफ्लाइट  असोसिएट न्यूरो-ऑक्युलर सिंड्रोम होऊ शकतो. याचा अर्थ त्यांच्या मेंदूतील पाण्याची पातळी वाढून त्यांच्या मेंदूला सूज येऊ शकते तसंच त्यांच्या डोळ्यातील बुबूळांचा आकार बदलून त्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.  

हे ही वाचा : अंतराळात माणसाचं शरीर कसं बदलतं?

हृदयाशी संबंधित विकार

ज्याठिकाणी गुरुत्वाकर्षण कमी असते तिथे आपल्या हृदयाचा आकार जो मुळात लंबाकार असतो तो गोलाकारामध्ये होतो. त्यामुळे हृदयाच्या क्रियेमध्ये अडचणी येऊन त्यासंबंधित विकार होण्याची शक्यता आहे. याशिवाय डोकेदुखी, अचानक बेशुद्ध होणे किंवा रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. 

आजारांची बाधा

नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर या दोन्ही अंतराळवीरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असणार. या कारणामुळे पृथ्वीवर परत आल्यावर इथल्या बदलत्या वातावरणाचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यांना कोणत्याही संसर्गजन्य आजाराची लागलीच बाधा होऊ शकते. 

मानसिक आरोग्य जपणं आवश्यक

गेल्या नऊ महिन्यापासून हे दोघे अंतराळवीर हे एकांतवासात राहत होते. त्यांच्या कोणाशीच संपर्क नव्हता. त्यामुळे पृथ्वीवर परतल्यावर त्यांना इथल्या वातावरणाशी मिसळून घेण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. या कालावधीत त्यांना एकटं राहावंस वाटू शकतं, नैराश्य, तणाव, अस्वस्थता या मानसिक स्थितीला सामोरं जावं लागू शकतं. 

त्यामुळे पृथ्वीवर परतताच या दोन्ही अंतराळवीरांना अनेक आरोग्य तपासण्या करुन घेऊन त्यानुसार औषधोपचार सुरू करावे लागणार आहेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

India - America : पाकिस्तानच्या संदर्भात दहशतवाद आणि काश्मीरच्या मुद्यावर भारताने आतापर्यंत कधीच कोणत्याच देशाची मध्यस्थी स्विकारली नाही आणि यापुढेही
Screen Addiction : भारतातील अनेक मुले दररोज 2 ते 4 तास स्क्रीनकडे बघतात. आणि कोरोनाच्या आधीचा काळापेक्षा आताचा हा स्क्रीन
Iran - Israel War : इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशा दरम्यान संघर्षाची ठिणगी पडली आहे. आखातातल्या या देशापासून आपण

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ