मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देणाऱ्या Budget 2025 मधील 10 महत्त्वाचे बदल

Union budget 2025 : 12 लाखापर्यंत टॅक्स नाही - इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देणारे खालील प्रमाणे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत.
[gspeech type=button]

– 12 लाखापर्यंत टॅक्स नाही – इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देणारे खालील प्रमाणे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. टॅक्स रिबेटचे लिमिट आधीच्या वर्षी असलेल्या 7 लाखावरून वाढवून 12 लाखापर्यंत नेण्यात आलेले आहे. याचाच अर्थ ज्यांचे उत्पन्न महिना 1 लाखापर्यंत आहे, त्यांना इन्कम टॅक्स भरायची गरज नाही. (यामध्ये Capital Gain सारख्या वेगळे टॅक्स रेट असणाऱ्या इन्कमचा समावेश नाहीये).

– 12 लाख ते 24 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 25 हजार ते 1,10,000 पर्यंत कमी टॅक्स भरावा लागेल.

– वार्षिक उत्पन्न 24 लाख किंवा त्यापेक्षा जास्त (महिना 2 लाख किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न) असणाऱ्यांना वार्षिक 1.10 लाखाचा फायदा होणार आहे.

– मोबाईल बॅटरी उत्पादनात लागणाऱ्या 28 वस्तूंना Exempted Capital Goods मध्ये समाविष्ट केल्याने मोबाईल फोन स्वस्त होयची शक्यता.

– 10 लाखापर्यंतच्या शैक्षणिक कर्जांवर आकारला जाणारा TCS (Tax Collected at Source) काढून टाकण्यात आला आहे. शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे नक्कीच दिलासा मिळेल.

– रेंटवर असणाऱ्या TDS चे लिमिट 2,40,000 वरून वाढवून 6,00,000 पर्यंत वाढवण्यात आले आहे. म्हणजेच महिना 50,000 पर्यंत भाडे देणाऱ्या आणि मिळणाऱ्या दोन्ही व्यक्तींना हा नियम दिलासा देणारा आहे.

– Senior Citizen मिळणाऱ्या Tax Deduction चे लिमिट 50,000 वरून वाढवून दुप्पट करण्यात आले आहे. म्हणजेच आता टॅक्स भरणाऱ्या Senior Citizen कडे 1,00,000 पर्यंत Deduction उपलब्ध केले गेले आहे.

– गिग वर्कर, म्हणजेच असे व्यावसायिक, ज्यांचे काम मिळालेल्या ऑर्डर प्रमाणे चालते. (उदा. लेखक, अभियंता इत्यादी) अशा सुमारे 1 करोड गीग वर्करचा समावेश e-shram पोर्टल वर करून घेण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल.

– नवीन स्टार्टअप सुरू करून त्या अंतर्गत मिळणाऱ्या टॅक्स सवलतीचा कालावधी 5 वर्षांनी वाढवण्यात आला आहे. नवीन उद्योगांना यामुळे नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

– स्वाहिम निवास योजने अंतर्गत 50,000 घरांचे बांधकाम झाले आहे आणि या वर्षांत अजून 40,000 घरांचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे. यातच अजून भर घालून 1,00,000 अधिक घरांच्या बांधकामासाठी 15,000 करोडचा निधी निश्चित केला गेला आहे. मध्यम आणि गरीब रेषेखालील जनतेला याचा लाभ घेता येईल.

1 Comment

  • Madhav

    Good message

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ