अबु सालेम बॉलीवूडचा कर्दनकाळ

Abu Salem: मुंबई अंडरवर्ल्डमध्ये कोणत्याही गैंगस्टरनं न केलेले कारनामे करणारा डी कंपनीचा एक गैंगस्टर होता, त्याचं नाव आहे अबू सालेम. एकेकाळी बॉलीवुडला आपल्या तालावर नाचायला भाग पाडणारा आणि ज्यांनी त्याचं ऐकलं नाही त्यांना थेट जीवे मारणारा क्रूरकमौ अशी अबू सालेमची ओळख आहे
[gspeech type=button]

मुंबई अंडरवर्ल्डमध्ये कोणत्याही गैंगस्टरनं न केलेले कारनामे करणारा डी कंपनीचा एक गैंगस्टर होता, त्याचं नाव आहे अबू सालेम. एकेकाळी बॉलीवुडला आपल्या तालावर नाचायला भाग पाडणारा आणि ज्यांनी त्याचं ऐकलं नाही त्यांना थेट जीवे मारणारा क्रूरकमौ अशी अबू सालेमची ओळख आहे.

बालपण

अबु सालेम उर्फ अबू सालेम अब्दुल कय्युम अन्सारी याचा जन्म उत्तर प्रदेशातल्या आझमगड जिल्हयातल्या सराई मिर नावाच्या एका छोट्या गावात झाला. सीबीआयच्या रेकॉर्डनुसार अबू सालेमचा जन्म 1969 मध्ये झाला. तर मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डनुसार त्याचा जन्म 1962 मध्ये इराला. अबु सालेमचं बालपण है तसं सधन कुटुंबात गेलं. त्याचे वडील वकिल होते. पण अबू सालेम लहान असतानाच एका अपघातात त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला. त्यानंतर घराची आर्थिक परिस्थिती बदलली, अबु सालेमला शाळा सोडून पैसे कमवण्यासाठी काम करावं लागलं. वयाच्या 15 व्या वर्षी तो दिल्लीत गेला. तिथं त्यानं टॅक्सी चालवायला सुरुवात केली. लवकरच त्याला मुंबई खुणावू लागली. 1985 च्या दरम्यान तो

मुंबईत आला. जोगेश्वरीतल्या अरासा मार्केट मध्ये असलेल्या छोट्या दुकानांतून सेल्समन म्हणून काम करायला त्यानं सुरुवात केली.

भाईशी दोस्ती आणि डी कंपनीत एन्ट्री

आरासा मार्केटमध्ये काम करता करता तिथल्या टपोरी गुंडांसोबत अबु सालेमची ओळख झाली. त्यातलाच एक गुंड एजाज टिंगू हा दाऊदचा लहान भाऊ अनिस इब्राहिमसाठी हफ्ते वसुलीचं काम करायचा. त्याच्या माध्यमातून अबु सालेमची अनिस इब्राहिमशी ओळख झाली. हळूहळू अबु सालेम डी कंपनीचा ड्रायव्हर बनला. त्याच्यावर सोपवलेली सामान डिलीव्हरीची जबाबदारी ती एकदम चोख पार पाडायचा त्याला डी कंपनीतले गुंड गमतीनं अबु सामान म्हणून हाक मारायचे.

1993 बॉम्बब्लास्ट

1993 पर्यंत खरे तर अबू सालेमन काही मोठे गुन्हे केलेले नव्हते. 1993 पर्यंत तो डी कंपनीत फक्त ड्रायव्हर म्हणूनच काम करत होता. 1993 च्या बॉम्ब स्फोटामध्ये सालेमन हत्यारं, पैसे आणि स्फोटासाठी लागणारं वेगवेगळं साहित्य वेगवेगळ्या गॅग्जना पुरवण्याचं काम केलं. अभिनेता संजय दतलाही त्यानंच हत्यारे पुरवली होती. बॉम्ब स्फोटानंतर मुंबई

पोलिसांनी संशयीतांची धरपकड सुरु केली तेव्हा अबू सालेम दुबईला पळून गेला. त्यानंतर पुढची अनेक वर्ष तो तिथंच राहीला.

बॉलिवूडवर पकड

दुबईत गेल्यावर अबू सालेमनं बॉलीवूड आणि बिल्डर यांना निशाणा बनवायला सुरुवात केली. बॉलिवुडमधल्या अनेक मोठ्‌या व्यक्तींना धमकावून त्यांच्याकडून तो ‘प्रोटेक्शन मनी मागायचा. 1997 मध्ये बॉलीवूडला हादरवून सोडणारी टी सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची हत्या सगळ्यांनाच आठवते. त्यांनी अबू सालेमला प्रोटेक्शन मनी ट्यायला नकार दिला होता. त्यानंतर दाऊद इब्राहिमशी फारकत झाल्यानंतरही त्यानं हे काम सोडलं नाही. त्यानं स्वत साठी हा व्यवसाय सुरु ठेवला. 1993 ते 2002 पर्यंत म्हणजे अटक होईपर्यंत संपुर्ण बॉलीवूड आणि मुंबईतले बांधकाम व्यावसायीक अबू सालेमच्या दहशतीखाली होते. 2001 मध्ये अबू सालेमनं मनिषा कोईरालाच्या पीएला मारलं. त्यानंतर त्याच्या चार शुटर्सना मुंबई पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केलं. 2002 मध्ये राकेश रोशन आणि राजिव राय तसंच डायरेक्टर लॉरेन्स डिसुझा, मनमोहन शे‌ट्टी यांनी त्याला पैसे ‌द्यायला नकार दिल्यानंतर त्यानं त्यांच्यावरही हल्ला केला. सुदैवानं ते या हल्यातून बवाचले. बांधकाम व्यावसायिकांनाही त्यानं सोडलं नाही. 1995 मध्ये प्रदिप जैन यांनी त्याला पैसे ‌द्यायला नकार दिल्यावर त्यानं जैन यांना ठार केलं. याच गुन्हयात तो सध्या शिक्षा भोगतोय.

शूटर्सची आयात

90 च्या दशकात मुंबई पोलिसांनी अंडरवल्डे विरोधात जोरदार मोहीम हातात घेतलेली होली. त्यामुळे डी गँगचे अनेक शूटर्स पोलिसांच्या गोळ्यांचे शिकार झाले होते. यावर अबू सालेमनं एक उपाय काढला. त्यानं आझमगडमधून शूटर्स आयात करायला सुरुवात केली. हे शूटर्स ट्रेननं मुंबईत यायचे, ज्यांना मारायची सुपारी घेतलीये ते काम पूर्ण करायचे आणि लगेच पुढची ट्रेन पकडून आझमगडला निघून जायचे. त्यामुळे मुंबई पोलिसांना अनेक घटनांमध्ये कधीच आरोपी मिळाले नाहीत. कारण है शूटर्स मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवर नव्हते. आणि अशा पद्धतीनं है काम केलं जातं हे मुंबई पोलिसांना कळतही नव्हतं.

पोलिसालाच बनवलं शूटर

मुंबई पोलिसांच्या लोकल आम्र्स डिवीजनया एक पोलिस शिपाई राजेश इगवे. त्याला सगळीच हत्यारे चांगलीच हाताळता यायची. पण दारुच्या व्यसनामुळे कामात तो हलगर्जीपणा करायचा. त्यामुळं त्याला निलंबीत करण्यात आलं होतं. त्यानंतर अबू सालेमन त्याला त्याच्या सोबत घेतलं, तो अबू सालेमसाठी सुपारी किलींग्ज करु लागला. पुढे राजेश इगवे पोलिस एन्काउंटरमध्ये मारला गेला.

दाऊदशी फारकत

1998 साल येईपर्यंत अबू सालेम आणि दाऊदचा राईट हॅन्ड छोटा शकिल यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. हळूहळू आपल्याला बाजूला केलं जातंय हे अबू सालेमच्या लक्षात आल्यावर त्यानं आपला मार्ग वेगळा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानं दुबई सोडलं. तो अमेरिकेला गेला. मोनिका बेदी त्याच्यासोबत होती. पण 2001 मध्ये अमेरीकेवर झालेल्या हल्यानंतर त्याला तिथं राहणं धोक्याचं वाटू लागलं. तो मोनिका बेदीला घेऊन नॉर्वेला तिच्या घरी गेला. पण तिच्या घरच्यांसोबत त्याला जुळवून घेता आलं नाही. ते दोघंही तिथून पोर्तुगालला गेले. तिथं दोघंही नाव बदलून रहायला लागले.

अटक आणि ओळख परेड

1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपीविरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यावरुनच 2003 मध्ये एफबीआयनं अब सालेमब‌द्दलची माहिती इंटरपोलला दिली. इंटरपोललन अबु सालेम आणि मोनिका बेदी दोघांनाही अटक केली. पण त्यानंतर अबु सालेमला भारतात प्रत्याप्रित करायला जवळपास तीन वर्ष लागली. कारण मुंबई पोलिसांचा वॉन्टेड आरोपी आणि इंटरपोलनं अटक केलेली व्यक्ती एकच असल्याचे कोणतेही पुरावे मुंबई पोलिसांकडे नव्हते. कधी काळी अबू सालेमने एका चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. त्यातला एक फोटो फक्त मुंबई पोलिसांकडे होता. पण अशा केसेसमध्ये आरोपीची ओळख पटवण्यासाठी

महत्वाचे असणारे फिंगरप्रिंटस मात्र पोलिस उपलब्ध करु शकत नव्हते. कारण त्यांनी मुंबईत कधीही अबू सालेमला अटक केलेली नव्हती.

1991 चा योगायोग

1991 मध्ये एटीएस प्रमुख आफदाब एहमद खान (ज्यांनी वडाळा शूटआऊट मध्ये माया डोळसला मारलं) आणि त्यांची टिम एक ऑपरेशन संपवून येत होती. जोगेश्वरीत अबू सालेम कुणाशी हुज्जत घालत होता. पोलिसांना बघुनही तो थांबला नाही आणि त्याची अरेरावी सुरुच होती. प ए खान यांनी त्याला पकडलं आणि पोलिस व्हॅनला मागे बांधून डि एन नगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी त्या वेळी त्याचे फंगरप्रिंटस घेऊन ठेवलेले होते. पण ही गोष्ट तेव्हा इतकी छोटी होती, की प्रत्यार्पणाच्या वेळी कुणाच्याही हे लक्षात आलं नाही. आणि मुंबई पोलिसांना आपल्याकडे अबू सालेमच्या बोटांचे ठसे नाहीत याचा खेद वाटत राहीला. पण 1991 मध्ये एए खान यांच्या टिममध्ये असलेले तत्कालीन पोलिस निरीक्षक जे 2003 मध्ये जॉइंट कमिशनर होते त्या इक्बाल शेख यांना 1991 चा प्रसंग आठवला. आणि त्यांनी डि एन नगर पोलिसांना त्यांचं रेकॉर्ड तपासायला सांगितलं. सुदैवानं पोलिसांना अबु सालेमचे फिंगरप्रिंटस मिळाले आणि त्याला भारतात प्रत्यार्पित करण्याचा मार्ग मोकळा झाला.

अखेर प्रत्यार्पण

भारताच्या दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर भारताला त्याच्या प्रत्यर्पणात यश आलं. पण पोर्तुगालच्या लिस्बन कोर्टानं सशर्त प्रत्यार्पणाला परवानगी दिली. त्यात त्यांच्या अटी होत्या, एक म्हणजे, अबू सालेमला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार नाही. कारण पोर्तुगालमध्ये कुणालाही मृत्युदंडाची शिक्षा दिली जात नाही. आणि ज्या देशांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते त्या देशातल्या गुन्हेगारांना पोर्तुगाल सरकार प्रत्यार्पित करत नाही. दुसरी अट होती अबु सालेवर प्रत्यार्पण अर्जात नमूद करण्यात आलेल्या आठ गुन्ह्यांसाठीच खटले चालवले जातील, त्याव्यतिरीक्त त्याच्यावर कोणताही नवीन गुन्हा दाखल करुन खटला चालवला जाणार नाही. आणि तिसरी अट म्हणजे अबू सालेमला 30 वर्षांपेक्षा जास्त दिवस तुरुंगात ठेवलं जाणार नाही. या सगळ्या अटी लिखीत स्वरुपात मान्य केल्यानंतरच अबू सालेम आणि मोनिका बेदीला भारतात प्रत्यार्पित करण्यात आलं.

खटला आणि शिक्षा

भारतात आल्यावर अनु सालेमवर मुंबई बॉम्बस्फोट, बांधकाम व्यवसायिक प्रदिप जैन आणि मनिषा कोईरालाचा पीए अजित दिवाणी यांचा खून असे आठ खटले त्याच्यावर चालवले गेले. यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. गुलशन कुमार खून प्रकरणात तो आरोपी असूनही त्याच्यावर हा खटला चालवला गेला नाही. कारण प्रत्यार्पण अर्जात मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याचा उल्लेखच केलेला नव्हता. याच कारणामुळे इतर अनेक खून आणि खंडणीच्या अनेक प्रकराणांमध्ये त्याच्यावर खटले चालवता आले नाहीत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ