टायगर मेमन – मुंबई बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाईंड!

Tiger Memon : 12 मार्च 1993 ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बहल्ला आजही मुंबई आणि भारतीयांसाठी एक ठसठसती जखम आहे. 1993 पर्यंतचा हा जगातला सगळ्यात मोठा अतिरेकी हल्ला मानला जातो. हा हल्ला दाऊद इब्राहिमनं घडवून आणला हे तर सगळ्यांना माहीतच आहे. पण या हल्ल्याचं प्लानिंग केलं होतं टायगर मेमननं. माहीममधला टायगर मेमन हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे.
[gspeech type=button]

12 मार्च 1993 ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बहल्ला आजही मुंबई आणि भारतीयांसाठी एक ठसठसती जखम आहे. अनेक निष्पाप लोकांना यात आपला जीव गमवावा लागला. 1993 पर्यंतचा हा जगातला सगळ्यात मोठा अतिरेकी हल्ला मानला जातो. हा हल्ला दाऊद इब्राहिमनं घडवून आणला हे तर सगळ्यांना माहीतच आहे. पण या हल्ल्याचं प्लानिंग केलं होतं टायगर मेमननं. माहीममधला टायगर मेमन हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे.

लहानपण आणि ओळख

24 नोव्हेंबर 1960 रोजी जन्मलेल्या टायगर मेमनंचं नाव संपूर्ण नाव मुश्ताक अब्दुल रझाक मेमन. त्याचे वडील क्रिकेटर होते. ते टायगर पतौडी यांच्यासोबत क्रिकेट खेळायचे. त्यामुळं त्यांनी मुश्ताकला टायगर म्हणायला सुरुवात केली. मुश्ताकनंही गुन्हेगारी जगतासाठी त्याचं नाव टायगर असंच नाव ठेवलं आणि तो टायगर मेमन नावानं ओळखला जाऊ लागला. शिक्षणात रस आणि प्रगती नसल्यानं त्याचं शिक्षण 10 वीच्या पुढे गेलं नाही.

टायगर मेमन हा कुणी गँगस्टर नव्हता. गुंडही नव्हता, तर तो एक स्मगलर होता. गँगस्टर आणि स्मगलर मुस्तफा डोसा याच्या गाडीवर तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा. त्यानंतर दाऊदनं त्याला त्याच्यासोबत घेतलं. दाऊद त्याच्यामार्फत सोनं आणि चांदिची स्मगलिंग करु लागला. टायगर मेमन झपाट्यानं मोठा होत होता. लवकरच तो आपल्याला टक्कर देणार अशी शंका दाऊदला येऊ लागली. दरम्यान दाऊद मुंबई सोडून पळून गेला.

खुनशी टायगर मेमन

टागर मेमन हा गँगस्टर नसला तरीही तो एक क्रूर व्यक्ती होता असं म्हटलं जातं. एकदा एका व्यक्तीनं त्याच्या बायकोला सुंदर दिसतेस अशी कॉम्प्लिमेंट दिली. पण त्यानंतर टायगर मेमननं त्या व्यक्तीच्या ऑफिसमध्ये जाऊन अख्की एके 47 त्याच्या पायात रिकामी केली. जाताना टायगर मेमन त्याला म्हणाला, तुला यासाठी जिवंत सोडतोय की “तू आयुष्यात कोणत्याही महिलेला तू सुंदर दिसतेस अशी कॉम्प्लिमेंट देणार नाहीस”. ती व्यक्ती आयुष्यभरासाठी व्हिलचेअरवर आली. यावरुनच तो किती खुनशी आणि निर्दयी होता हे दिसतं.

हल्ल्याची पार्श्वभूमी

डिसेंबर 1992 मध्ये भारताच्या इतिहासातली एक मोठी घटना घडली आणि भारताचं भविष्य अनेक अंगांनी बदललं. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जीद पाडण्यात आली. त्यानंतर भारतभर जातीय दंगली उसळल्या. अनेकांची घरं, आयुष्य उद्ध्वस्थ झाली. मुंबईतही जातीय दंगली पेटल्या. यात अनेकांचं अनेक प्रकारे नुकसान झालं. टायगर मेमनचंही माहीममध्ये आयात निर्यात कंपनीचं एक आलिशान ऑफिस होतं. दंगली सुरु असतानाही तो त्या ऑफिसमध्ये असायचा. पण एका रात्री तो घरी गेला आणि सकाळी परत आला तेव्हा, त्याला त्याच्या ऑफिसचा शिल्लक राहीलेला सांगाडाच फक्त मिळाला.

टायगर मेमन हा अतिशय खुनशी स्वभावाचा होता. त्यामुळं त्याचं ऑफिस जाळण्याची घटना तो विसरला नाही. आणि त्याचा बदला घेण्याचा निश्चय केला.

हल्ल्याचा कट

दाऊदच्या मदतीनं टायगर मेमननं मुंबईवर हल्ला करण्याचा कट रचला. त्यात पाकिस्तानच्या आएसआयनंही त्यांना मदत केलीय. तस्करीच्या कामात त्याला मदत करणाऱ्या आणि ज्यांची पोलिस रेकॉर्डवर नोंद नाही अशा तरुणांना त्यानं जमा केलं. जानेवारी 1993 मध्ये या तरुणांना टायगर मेमननं पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी नेलं. तीन महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर मार्चमध्ये ही तरुण मुलं परत आली.

पोलिसांच्या डोळ्यासमोर शिजला कट

माहीम पोलिस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर अल हुसैनी नावाची इमारत आहे. ज्या इमारतीत टायगर मेमन आणि त्याचे भाऊ रहात होते. पाकिस्तानातून परत आल्यानंतर या इमारतीत सगळ्यांचा वावर वाढला. टायगर मेमननं हल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणात आरडीएक्स मागवलं होतं. ते वापरुन याच इमारतीत बॉम्ब तयार करण्यात आले. इथंच वेगवेगळ्या कार्समध्ये ते ठेवण्यात आले. एवढी सगळी हालचाल होत असतानाही पोलिसांच्या काहीही लक्षात आलं नाही.

पोलिसांचा हलगर्जीपणा

हा सगळा कट शिजत असताना, हल्ल्याची तयारी सुरु असताना अचानक अल हुसैनी इमारतीच्या बाहेर एका स्कुटरला आग लागली. पोलिस स्टेशनला फोन आल्यावर एक हवालदार तिथं पोहोचला. आणि आग बघून त्यानं त्याच्या वरिष्ठांना कळवलं की, कदाचीत स्कूटरचा फ्युअल टॅंक लिक झाल्यामुळं आग लागली. पण जर पोलिसांनी त्या आगीची नीट दखल घेतली असती तर, ही अख्खी बॉम्बस्फोट मालिका रोखता आली असती. कारण त्या स्कूटरमधुन वाहून आणलेल्या आरडीएक्समुळं स्कूटरच्या डिकीला आग लागली होती. आणि ती स्कूटर अल हुसैनी इमारतीच्या समोर उभी होती. त्यामुळं 1993 च्या बॉम्बस्फोटाला जितकं टायगर मेमन, दाऊद इब्राहिम आणि आयएसआयला जबाबदार धरलं जातं, तेवढंच मुंबई पोलिसांनाही जबाबदार धरलं जातं.

भारतातून पलायन

12 मार्च 1993 या दिवशी मुंबईतल्या 12 ठिकाणी हल्ला करण्याचं ठरलं. प्लानिंग झालं, दरम्यान टायगर मेमननं त्याच्या कुटुंबीयांना भारतातून बाहेर पडण्याची तयारी करुन ठेवली. त्यासाठी खोटे पासपोर्ट बनवले. दुबई आणि त्यानंतर पाकीस्तानात राहण्याची व्यवस्था केली. यात आयएसआय आणि दाऊदनं आर्थिक मदत केली. आणि प्लाननुसार हल्ल्याच्या आधीच्या दिवशीच टायगर मेमननं त्याच्या कुटुंबीयांसोबत मुंबई सोडली आणि तो दुबईला गेला आणि काही दिवसांतर तो पाकिस्तानात गेला. कारण त्याला माहीत होतं, की हल्ला झाल्यानंतर पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचतीलच.

अजुनही पाकिस्तानात वास्तव्य

टायगर मेमन हा आजही नाव बदलून पाकिस्तानात सरकारी संरक्षणात रहात असल्याचं बोललं जातं. तो पाकिस्तानच्या प्रतिष्ठीत भागात एका आलिशान घरात राहतोय आणि तिथं तो रिअल इस्टेट आणि तस्करीचा व्यवसाय करतोय. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान नेहमीच ही गोष्ट नाकारत आलंय.

आत्मसमर्पण की अटक ?

टायगर मेमन त्याच्या कुटुंबियांसोबत भारत सोडून पळून गेला. पण आयएसआयनं वर्षभर दिलेल्या वागणुकीनं मेमन कुटूंबाला त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत होता. त्यामुळं त्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. पण टायगर मेमन मात्र याला तयार नव्हता. त्यामुळं कुटुंबातल्या बाकी जणांनी आत्मसमर्पण केलं. पण यातली दुसरी थिअरी अशी आहे की, ऑगस्ट 1994 मध्ये सीबीआयनं टायगर मेमनला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर अटक केल्याची माहिती दिली. त्याच्याकडे एक सुटकेस होती, त्यातून त्याच्यावर चालवण्यात आलेल्या खटल्याचे महत्वाचे पुरावे कोर्टाला मिळाले. आणि त्यानंतर त्याच्या बाकी कुटुंबाला दुबईतून भारतात आणण्यासाठी ऑपरेशन ‘दिल्ली दरबार’ राबवलं. आणि दुबईतून मेमन कुटुंबातील इतर सदस्यांना आयएसआयला चकमा देत भारतात आणलं. त्यांच्यावर खटले भरले गेले, याकुबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 30 जुलै 2015 मध्ये त्याला नागपूरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. पण या कटाचा मास्टरमाईंड मात्र अजूनही मोकाट फिरतोय. याकूबच्या फाशीनंतर टायगर मेमननं पुन्हा त्याचा बदला घेण्याची भारत सरकारला धमकीही दिली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि
Agricultural Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील भागांमध्ये आपण या उद्योगांची अधिक माहिती घेत आहोत.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ