दिघी होणार स्मार्ट औद्योगिक शहर

विकसित भारत या संकल्पनेवर आधारित औद्योगिक विकासाला गती मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम (NICDP) राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सोयी -सुविधांसह सुसज्ज अशी 12 कॉरिडॉर्स विकसीत करण्यात येणार आहे.  यामध्ये देशभरातील 10 राज्यांतून 12 शहरांची निवड केलीये.
[gspeech type=button]

रायगडमधील दिघीला मान 

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी देशात स्मार्ट औद्योगिक शहरांची निर्मिती करण्यात येणार आहे. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास असं या कार्यक्रमाचं नाव आहे. देशभरातल्या 12 शहरांचा यामध्ये सामावेश केला आहे. रायगडमधील दिघी बंदराजवळच्या 6,056 एकर जमिनीवर हे स्मार्ट औद्योगिक शहर तयार करणार आहे. या राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाला दिनांक 28 ऑगस्ट 2024 च्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूरी मिळाली. या कार्यक्रमासाठी 28,602 कोटीची तरतूद करण्यात आलीये. 

काय आहे स्मार्ट औद्योगिक शहर कार्यक्रम

विकसित भारत या संकल्पनेवर आधारित औद्योगिक विकासाला गती मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सोयी -सुविधांसह सुसज्ज अशी 12 कॉरिडॉर्स विकसीत करण्यात येणार आहे.  यामध्ये देशभरातील 10 राज्यांतून 12 शहरांची निवड केलीये.

कोणत्या शहरात तयार होणार स्मार्ट औद्योगिक शहर (GFX)

 

गुंतवणूक

विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करताना, शाश्वत विकासालाही तितकचं महत्व देणं गरजेचं आहे. हाच उद्देश समोर ठेवून दीर्घकाळ टिकतील अशा पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. यातूनच औद्योगिक क्षेत्राला कलाटणी मिळले, अशी परिसंस्था निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या उद्योग समूहांसोबतच एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम अशा दोन्ही स्वरूपातील उद्योग क्षेत्रांवर भर देणार आहेत. या संपूर्ण एनआयसीडीपी कार्यक्रमातून 2030 पर्यंत 2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत निर्यात वाढवता येईल.

‘प्लग – अॅन्ड – प्ले’ आणि ‘वॉक – टू – वर्क’ संकल्पना

औद्योगिक क्षेत्राचा विकास करताना देशातील ही 12 कॉरिडॉर्स ही सर्व सुविधांनी विकसीत केली जाणार. प्लग – अॅन्ड प्ले आणि वॉक – टूवर्क या संकल्पनेवर आधारित ही कॉरिडॉर्स असणार आहेत. प्लग अॅन्ड प्ले आणि वॉक टूवर्कम्हणजे या औद्योगिक क्षेत्रात एखाद्या कंपनीला आपला व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तिकडे सगळ्या पायाभूत सुविधा या आधीच उपलब्ध असतील. त्यासाठी कंपन्यांना कोणत्याही स्वरूपाचे बदल करण्याची गरज पडणार नाही. याचा विचार करून या क्षेत्रांचा विकास केला जाणार आहे.

रोजगार निर्मिती

एनआयसीडीपीमुळे आर्थिक विकास तर होणारच आहे. पण त्यामुळे व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत.

शाश्वत विकासाला महत्त्व

देशभरातील हे 12 औद्योगिक कॉरिडॉर्स पर्यावरणपूरक असतील, यावर लक्ष केंद्रित केलं आहे. अधिकाधिक हरित तंत्रज्ञानासह दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकतील अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे.

दिघीचं रूप पालटणार

दिघी इथं राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे. दिघीचं भौगोलिक स्थान पाहता याठिकाणी दळण-वळणाच्या अनेक संधी आहेत. मुंबई-गोवा महामार्ग, दिघी बंदर आणि दिघी विमानतळ या सर्व सुविधांमुळे दिघीला वेगळं महत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे राष्ट्रीय औद्योगिक विकास कॉरिडॉर म्हणून सुद्धा दिघीची निवड केलीये.

या नविन प्रकल्पांमुळे दिघीमध्ये रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास 38 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होईल तसंच 1 लाखाहूंन अधिक रोजगार निर्माण होतील. 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Senior Citizen Health Insurance : ज्येष्ठ नागरिकांना आता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आरोग्यविमा काढता येणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास
Mobile charger:अनेकदा आपण या उपकरणाचे चार्जर्स हे प्लगमध्ये बटन सुरु ठेवून (स्वीच ऑन) तसेच ठेवतो. मात्र, चार्जर्स सतत प्लग इन
Kaveri Jet Engine : भारताकडून रशियामध्ये स्वदेशी बनावटीच्या कावेरी जेट इंजिनच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. डीआरडीओ या भारतीय संरक्षण शस्त्रास्त्राच्या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ