मानवी शरीरात सतत बदल होत असतात आणि हे बदल इतके सूक्ष्म असतात की आपल्याला ते समजतही नाहीत. शरीराच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या वेळेस नवनिर्मितीची प्रक्रिया सुरु असते.
जगातील सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे माणसाचे शरीर स्वतःला सतत पुनर्निर्मित करत असते. आपल्या शरीरात दर 5 ते 10 मिनिटांनी नवीन पेशी तयार होतात आणि जुन्या पेशी नष्ट होतात. तुम्हांला आश्चर्य वाटेल पण दर 7 ते 10 वर्षांनी आपल्याला पूर्णपणे नवीन शरीर मिळते. कारण नवीन अवयव आणि टिशू तयार होतात. कसं ते पाहुयात.
पचनसंस्था दर 4 दिवसांनी स्वतःला नव्याने तयार करते.
शरीरातील अन्न पचवणाऱ्या पेशी दर 5 मिनिटांनी बदलतात.
150 दिवसांनी लिव्हरमध्ये बदल होतो.
त्वचेचा बाह्य थर, ज्याला ‘एपिडर्मिस’ म्हणतात, तो दर 4 आठवड्यांनी बदलतो.
पॅन्क्रियाज (जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो) दर 50 दिवसांनी नव्याने तयार होतो.
4 महिन्यांत संपूर्ण शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात. रक्तदान केल्यानंतर 12 आठवड्यांत रक्तपेशी पूर्णपणे बदलतात.
जीभेवरील चव कळवणारे कण दर 10 दिवसांनी बदलतात.
पण, काही अवयवांमध्ये हा बदल हळूहळू होतो. उदाहरणार्थ, हाडे पूर्णपणे नव्याने तयार होण्यासाठी 10 वर्षे लागू शकतात. वय वाढत गेल्यावर हाडे मजबूत होण्याची प्रक्रिया हळू होऊ लागते आणि हाडे कमकुवत होऊ शकतात.
बदल न होणारे शरीरातील घटक
आपल्या शरीरातील अनेक अवयवांमध्ये पुनर्निर्मितीची क्षमता आहे, पण काही भाग कधीही नव्याने तयार होत नाहीत. उदा. डोळ्यातील अंतर्गत लेन्स तयार करणाऱ्या पेशी आणि मेंदूच्या बाह्य थरातील (सेरेब्रल कॉर्टेक्स) न्यूरॉन्स यांचे पुनर्निर्माण होत नाही.
शरीरात जमा होणारी चरबी ही आपल्या आहारावर, शरीराची हालचाल आणि व्यायामावर अवलंबून असते. शरीरात सतत बदल होत असले तरी आपलं कॉन्शियसनेस, आठवणी आणि स्वतःबद्दलची जाणीव कायम राहते. जसं की, जीभेवरील चवीचे कण दर 10 दिवसांनी बदलतात. पण आपण पूर्वी चाखलेले चविष्ट पदार्थ आणि त्याच्या चवीची आठवण कायम राहते.