दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
मुंबई – 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
जालना – शासकीय कंत्राटदारांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात
सांगली – आदिती फुडसला शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज; आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई – माजी आमदार राजन साळवी शिवसेना शिंदे गटामध्ये करणार प्रवेश; दुपारी तीन वाजता ठाण्यातील कार्यालयात होणार पक्षप्रवेश कार्यक्रम
दिल्ली – सोयाबीन खरेदीच्या कालावधीत मुदतवाढ करावी यासाठी संसदेच्या परिसरात महाविकास आघाडीतील खासदारांचं आंदोलन
पॅरिस – एआय परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा विकास नियोजनाची ऑनलाइन बैठक; शिवसेना गटाचे आमदार अनुपस्थितीत असल्याची माहिती
‘अरण्यऋषी’ हरपले!
निसर्गाचे अभ्यासक, साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचं बुधवार दिनांक 18 जून 2025 रोजी निधन झालं. ते 93 वर्षाचे होते. त्यांना ‘अरण्यऋषी’ या विशेष नावाने ओळखलं जायचं.
मारुती चितमपल्ली यांनी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामध्ये 36 वर्ष काम केलं. या कार्यकाळात त्यांनी देशभर संशोधकवृत्तीने भटकंती केली. त्यांना 13 भाषा अवगत होत्या.
देशभर फिरत असताना त्यांनी आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत पर्यावरणाशी संबंधित माहितीची नोंद डायरीमध्ये करत गेले. या माहितीच्या आधारावर त्यांनी पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचं लेखन केलं.
अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली आहेत.
संशोधनपर लेखन करणाऱ्या चितमपल्ली यांचा साहित्यक्षेत्रातही वावर होता. त्यांनी अ.भा. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं आहे.
निसर्ग, वन्यजीव अशा पर्यावरण क्षेत्रातलं आणि साहित्य क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाची नोंद घेत 30 एप्रिल 2025 रोजी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
निसर्गाचे अभ्यासक, साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचं बुधवार दिनांक 18 जून 2025 रोजी निधन झालं. ते 93 वर्षाचे होते. त्यांना ‘अरण्यऋषी’ या विशेष नावाने ओळखलं जायचं.
मारुती चितमपल्ली यांनी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामध्ये 36 वर्ष काम केलं. या कार्यकाळात त्यांनी देशभर संशोधकवृत्तीने भटकंती केली. त्यांना 13 भाषा अवगत होत्या.
देशभर फिरत असताना त्यांनी आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत पर्यावरणाशी संबंधित माहितीची नोंद डायरीमध्ये करत गेले. या माहितीच्या आधारावर त्यांनी पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचं लेखन केलं.
अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली आहेत.
संशोधनपर लेखन करणाऱ्या चितमपल्ली यांचा साहित्यक्षेत्रातही वावर होता. त्यांनी अ.भा. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं आहे.
निसर्ग, वन्यजीव अशा पर्यावरण क्षेत्रातलं आणि साहित्य क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाची नोंद घेत 30 एप्रिल 2025 रोजी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.