मधमाश्या भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय!

Rent-a-Bee-Business : कृषी क्षेत्रामध्ये ‘मधमाश्या भाडेतत्वावर देणे’ हा व्यवसाय तेजीत आला आहे. शेती क्षेत्रासाठी, पिकांच्या वाढीसाठी मधमाश्या या अतिशय उपयुक्त कीटक आहेत.
[gspeech type=button]

मधमाशी भाड्याने देणे हा व्यवसाय असू शकतो असं तुम्हाला स्वप्नातही वाटलं नसेल. पण कृषी क्षेत्रामध्ये ‘मधमाश्या भाडेतत्वावर देणे’ हा व्यवसाय तेजीत आला आहे. शेती क्षेत्रासाठी, पिकांच्या वाढीसाठी मधमाश्या या अतिशय उपयुक्त कीटक आहेत. आइनस्टाइन यांनी म्हटलं आहे की, जर पृथ्वीवरुन मधमाश्या पूर्णत: नाहिशा झाल्या तर मानवप्राणी त्यापुढची फक्त चार वर्ष जगू शकतो. मधमाश्यांच्यामार्फत सगळ्यात जास्त परागीभवन होतं. त्यामुळे जर पृथ्वीतलावरुन मधमाशा नाहीशा झाल्या तर शेती उत्पादनावर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होईल. 

मात्र, अलिकडे हवामान बदल, नैसर्गिक अधिवास संपुष्टात येणे, रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा अतिरेकी वापर यामुळे पिकांच्या वाढीसाठी, फळांच्या परागीभवनासाठी आवश्यक असणाऱ्या कीटकांचा आणि मधमाशांचाही नाश होतो. त्यामुळे फळ – फुलझाडाचं  योग्य पद्धतीने परागीभवन होत नाही. परिणामी उत्पादन पुरेसं येत नाही. त्यामुळे शेत उत्पादनाच्या वाढीसाठी आता शेतकरी भाडेतत्वावर मधमाशा घेतात. मधमाशा मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शेतकरी किंवा होतकरूंकरता हा नवीन व्यवसाय उदयास आला आहे. 

मधमाश्या पालन व्यवसाय 

उत्तम फळ उत्पादनासांठी मधमाश्यांकडून केल्या जाणाऱ्या परागीभवनाची खूप गरज असते. जितकं जास्त परागीभवन होतं तितकं जास्त आणि उत्तम दर्जाचं उत्पन्न मिळत असतं. मात्र मधमाश्यांच्या कमतरतेमुळे शेतउत्पादनावरही परिणाम झाल्याचं निदर्शनास आल्यावर नितीन कुमार सिंग यांनी मधमाशा पालन करुन त्या भाडे तत्वावर देण्याचा व्यवसाय सुरु केला. 

नितीन कुमार सिंग हे मुळचे उत्तरप्रदेशमधल्या बाराबांकी जिल्ह्यातले. त्यांनी पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान विषयात डॉक्टरेट केली आहे. जर्मनीतल्या मुन्स्टर विद्यापीठामध्ये इंटिग्रेटेड फंक्शनल जीनोमिक्समध्ये रिसर्च फेलो आणि इस्त्रायलमधल्या कृषी संशोधन संघटनेत पोस्टडॉक्टरल संशोधक म्हणून काम केलं आहे. 

नितीन कुमार सिंग सांगतात की, मधमाश्या या केवळ मध गोळा करण्याचं काम करत नाहीत. तर त्या खरंतर पर्यावरण वाचवण्याचं काम करत असतात. शेतकऱ्यांसाठी तर त्यांच्या परिसरात जास्त  मधमाश्या असणं हे एक वरदानच असतं.  नितीन सिंग यांनी 600 पेट्यांमध्ये 1 लाख 25 हजारहून जास्त मधमाश्या पाळल्या आहेत. त्यांच्या प्रयोगामुळे बिहारमधल्या मुझफ्फरबाद इथे लिची उत्पादनात  आणि हिमाचल प्रदेशमधल्या किन्नौर इथल्या सफरचंद उत्पादनात वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. या व्यवसायाला ‘रेंट – ए – बी’ किंवा ‘भाडेतत्वावरील परागकण’ या नावाने ओळखलं जातं. 

हे ही वाचा : उत्तराखंडमध्ये सायकॅड वनस्पतींची पहिली बाग!

मधमाश्यांची काळजी

मधमाश्या निरोगी राहण्यासाठी त्यांना नियमीत ताजा रस मिळणं आवश्यक असतं. आजुबाजूच्या परिसरात हाय-टेन्शन केबल्स किंवा फोनचे टॉवर नसले पाहिजेत. तसंच मधमाश्यांच्या वाढीसाठी कुठल्याही प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर करता येत नाही. 

मणिपूरपासून महाराष्ट्रापर्यंत नितीन कुमार सिंग हे त्यांच्या मधमाश्यांना भाडेतत्वावर देतात. उत्तरप्रदेशमधल्या स्थानिक शेतकऱ्यांमध्ये अजून तितकी मागणी वाढलेली नाही आहे. मात्र हिमाचल प्रदेशमधले सफरचंद उत्पादक आणि नागपूरमधल्या संत्रा उत्पादक मात्र हंगामाच्या वेळी परागीभवनासाठी मधमाश्या मागवून घेतात. 

यातल्या बऱ्याचशा मधमाश्या या इटालियन एपिस मेलिफेरा लिगुस्टिका या वंशांच्या आहेत. या मधमाश्यांना फळाच्या हंगामाच्या काळात मोठी मागणी असते. तसंच या मधमाश्या दिवसा प्रवास न करता सूर्यास्त झाल्यावर रात्रीच्या वेळेतच प्रवास करतात. आपल्यासारखा त्यांच्याही दिनक्रम ठरलेला असतो. 

मधमाश्या कशा काम करतात..

ज्याप्रमाणे शेतात शेतकरी किंवा शेतमजूर काम करतात. त्याचप्रमाणे पिकांच्या हंगामावेळी या मधमाश्यांना कामासाठी घेतलं जातं. मधमाश्या भाड्यावर घेतल्यावर संबंधित शेतकऱ्याला सकाळी मधमाश्या ज्या पेट्यामध्ये असतात त्या उघडायच्या असतात. या पेट्यांना पोळे किंवा न्यूटन पोळे असं म्हटलं जातं. या पेट्या उघडल्यावर सगळ्या मधमाश्या या त्या पेट्यातून बाहेर पडून मध गोळा करायला जातात. सूर्यास्तावेळी शेतकऱ्यांना पुन्हा त्या सगळ्या पेट्या उघड्या करुन ठेवायला लागतात. मधमाश्या स्वत:हून येऊन त्या पेट्यांमध्ये बसतात. 

भाडेतत्वावरील मधमाश्यांच्या पेटीची किंमत

एका मधमाश्यांच्या पेटीची किंमत प्रति महिना अडीच हजार रुपये आहे. जवळपास 14 गुंठे शेतजमिनीवर परागीभवनासाठी मधमाश्यांच्या 10-12 पेट्याची गरज लागते. याची किंमत ही बहुतांशी वेळा हंगामावर अवलंबून असते. ऑक्टोबर ते मे असे सात महिने हा मधमाश्यांचा मधाचे पोळे काढण्याचा हंगाम असतो. या काळात जर मधमाश्यां भाडेतत्वावर घ्यायच्या असतील तर त्याचा दर जास्त असतो. जून ते सप्टेंबरच्या काळात या पेट्यांची किंमत तुलनेने कमी असते. 

हे ही वाचा : आंबा उत्पादन वाढवण्यासाठी आंब्यावर आच्छादन तंत्र; आंध्रप्रदेशमध्ये अभिनव उपक्रम

मधमाश्या व्यवसायाची स्थिती – मागणी

मधमाश्या पालन म्हणजे मध विक्री या एवढाच फायदा नाही. मुळात या व्यवसायाविषयी पुरेशी माहिती वा जनजागृती नसल्यामुळे या क्षेत्रात खूप कमी व्यावसायिक आहेत. राजस्थानमधले राम किशोर यादव हे ‘शहादवाले’ या नावाने मधमाश्या पालन व्यवसाय करतात.  ते सांगतात की, मधमाश्याच्या  पीकांसाठी काय उपयोग आहे याविषयी खूप कमी शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपेक्षा बियाणे उत्पादक कंपन्यांकडून मशमाश्यांची मागणी जास्त असते. मधमाश्यांच्या परागीकरणामुळे बियाण्याची गुणवत्ता आणि पिकांचे उत्पादन वाढू शकते म्हणून बियाणे उत्पादक कंपन्या या प्रामुख्याने परागीकरणासाठी मधमाश्यांवर अवलंबून असतात. 

मधमाश्यांचं अस्तित्व धोक्यात

मधमाश्यांच्या परागीभवनकरणामुळे पीक उत्पादनात 20 – 35 टक्के वाढ होऊ शकते. मात्र, अलिकडे हवामान बदल, रासायनिक खतांच्या अतिरेक वापरामुळे आणि नैसर्गिक अधिवास नाश होत असल्यामुळे या मधमाश्यांना ताजा रस मिळत नाही. त्यामुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.  सातत्याने हवामान बदलत असल्यामुळे त्यांच्या पोळे काढण्यामुळे एकूणच त्यांच्या जीवनक्रमामध्ये अडथळा येत आहे. त्यामुळे भारतात मधमाश्यांमध्ये 20 टक्के घट झाली आहे. तर ओडिसा राज्यामध्ये मधमाश्यांमध्ये 80 टक्के घट झाली आहे. 

परागीकरणातल्या मधमाश्यांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे.  मधमाश्यांच्या संख्येत घट झाल्यामुळे  पीक उत्पादनातही घट होते. पीक उत्पादन घटलं तर अन्न सुरक्षेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पीक उत्पादनासह वनस्पतींच्या जैवविविधतेवरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो. कारण वनस्पतींच्या अनेक प्रजाती या परागीकरणासाठी मधमाश्यांवर अवलंबून असतात. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

government schemes : गेल्या 11 वर्षांपासून देशात मोदी सरकार सत्तेत आहे. या काळात त्यांनी ग्रामीण भागासाठी आणि विशेषतः महिलांसाठी खूप
Kerala : केरळमधले जवळपास 941 गावं आहेत, त्यापैकी 273 गावांमध्ये जंगली प्राण्यांचा त्रास खूप वाढला आहे. हे प्राणी म्हणजे कोण?
Finance : आर्थिक वर्ष 2024 - 2025 चा इन्कम टॅक्स भरण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म्स इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध झालेले

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ