राज्यघटना कशी तयार झाली?
डॉ. आंबेडकरांनी घटनासमितीकडे 26 नोव्हेंबर 1949 ला राज्यघटनेचा मसुदा सादर केला. 26 जानेवारी 1950 पासून आपली राज्यघटना अंमलात आली. त्यानंतर आपली राज्यघटना आकारास यायला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले. राज्यघटना तयार करण्यासाठी 64 लाख रुपये खर्च आला. मसुदा समितीत महिला आणि पुरूष मिळून 271 सदस्य होते. आपली राज्यघटना तयार करण्यासाठी 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात केला.
LIVE: President Droupadi Murmu’s address at Samvidhan Divas – 2024 in New Delhi https://t.co/QmEan4ue9o
— President of India (@rashtrapatibhvn) November 26, 2024
राज्यघटनेची वैशिष्ट्ये
जगातली सर्वात मोठी लेखी राज्यघटनेचा मान आपल्या राज्यघटनेला आहे. यात 1 लाख 17 हजार 360 शब्द आहेत. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे उद्दिष्ट सर्व भारतीयांकरता सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकतांत्रिक प्रजासत्ताक न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, एकात्मता आणि समता प्रदान करते. आपली राज्यघटना एकाच वेळी कठीण आणि लवचिकही आहे. यातल्या काही तरतुदी कठीण आहेत. उदाहरणार्थ, संविधानाची प्रस्तावना, उद्दीष्टे बदलू शकत नाही. लवचिक भाग म्हणजे बदललेल्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या व्याख्या करण्याची परवानगी संविधानाने दिली आहे.
भारत आणि भारतीय नागरिक घडण्याची लोकचळवळ
अॅड. निलेश खानविलकर ठिकठिकाणी संविधानाचे महत्त्व आणि आपले अधिकार याबद्दल नागरिकांना जागृत करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या चळवळीविषयी त्यांनी सांगितलं की, “भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता (मैत्रीभाव) आदी मूल्यांच्या प्रचार व प्रसाराद्वारे हिंसामुक्त युवा घडविण्याच्या उद्देशाने संविधान प्रचारक या लोकचळवळीची सुरुवात झाली. विषमतावादी प्रवृतींनी संविधानाला मातीत मिळवण्याआधी संविधानिक मूल्यांना मातीत रुजवण्याचा एल्गार पुकारत फेब्रुवारी 2019 मध्ये विविध सामाजिक संस्था संघटनातील विवेकी युवांनी एकत्र येत ह्या लोकचळवळीचा पाया रचला. संविधान प्रचारक लोकचळवळ ही कुठली संस्था किंवा संघटना नाही, कुठल्याही एका संस्था संघटनेचा कार्यक्रम देखील नाही, मात्र जबाबदार नागरिक व विविध संस्था संघटनाच्या सहकार्याने ही प्रक्रिया चालविली जात आहे. या लोकचळवळीचे ब्रिदवाक्य “भारत आणि भारतीय नागरिक घडण्याची लोकचळवळ” असे आहे. मूल्याधारित दृष्टीकोण रुजवण्यासाठी फक्त मूल्यांचा प्रचार प्रसारच नाही, तर मूल्यांच्या आधारावर जीवन जगणे आणि मुल्यविरोधी घटनांबाबत भूमिका घेणे, हे या लोकचळवळीच्या माध्यमातून घडत आहे. केवळ नागरिकांच्या हक्क अधिकारासाठी दबावगट म्हणून नव्हे; तर भारतीय नागरिकांची कर्तव्य बजावण्यासाठी सुद्धा संविधान प्रचारक पुढाकार घेत आहेत”.

5 हजाराहून अधिक संविधान प्रचारक
संविधान प्रचारक लोकचळवळ विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, शासकीय, निम-शासकीय विभाग यांच्या सहयोग आणि सहभागाद्वारे भारतीय नागरिक म्हणून सर्व समुदयासोबत काम करत आहे. देशातील विविध राज्ये आणि जिल्ह्यात संविधान प्रचारक संयोजन गट कार्यरत होण्याची प्रक्रिया सुरु आहे. आजतायागत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून 5 हजाराहून अधिक संविधान प्रचारक तयार झाले आहेत. महाराष्ट्रातील एकूण 18 जिल्ह्यांमध्ये संविधान प्रचारक कारवा पोहचला आहे. तसेच महाराष्ट्रबाहेर राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड या राज्यात देखील संविधान प्रचारक चळवळ कार्यरत आहे. संविधान प्रचारक या लोकचळवळीची संविधानाची प्रस्तावना हीच विचारधारा आणि हाच जाहीरनामा मानून हा जागर निरंतर चालू आहे.
संविधान प्रचारक तयार करण्याचे कार्यक्रम
यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यशाळा, विभागस्तरीय शिबीर, राज्यस्तरीय छावणीच्या माध्यमातून संविधान प्रचारक घडण्याची प्रक्रिया चालवली जाते. तसेच संविधान प्रचारक कार्यशाळा घेणारे प्रशिक्षक घडण्यासाठी वर्षभराचा प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम महराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवर राबवला जातो. तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेतील मुल्ये, भारतीय उज्ज्वल उन्नत संस्कृती आणि इतर घटकांचा संविधानावरील प्रभाव, संविधान निर्मितीचा इतिहास, मुलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, मुलभूत कर्तव्ये आणि इतर संविधानातील गोष्टी या विविध संवाद बैठका, ऑनलाईन व प्रत्यक्ष सत्रे, अभ्यासवर्ग आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांपर्यंत पोहचवल्या जात आहेत.
संविधान दर्शिका
राज्यघटनेची तत्वे खेड्यापाड्यापासून महानगरांपर्यंत प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहचावीत म्हणून रिसोर्स एण्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट दरवर्षी अनोखं कॅलेंडर दरवर्षी प्रकाशित करते. ‘संविधान दर्शिका’ असं या कॅलेंडरचं नाव आहे. यात दिनांक, वार हे असतातच पण संविधानाबद्दलची माहितीही समाविष्ट असते. जेणेकरून रोज येता-जाता ही तत्वे आपल्या मनावर बिंबवली जातील आणि आपण आपल्या संविधानाबद्दल जागरूक असू. 2025 ची संविधानदर्शिका तयार झाली आहे. या नव्या संविधान दर्शकेत लोकशाही उत्सव, संविधान प्रचारक, संविधान साक्षरता, हर घर संविधान कार्यक्रम, संविधान प्रतिज्ञेचा अर्थ, मतदार जागृती अभियान, विशेष निवडणूक सुधारणा, कामगार आणि संविधान, अर्थपूर्ण राष्ट्रध्वज याबद्दलचे लहान लेख आहेत. सहज सोप्या भाषेतील या लेखांमुळे विद्यार्थी आणि मोठ्या वयोगटालाही आपले संविधान आणि आपले अधिकार समजणे सोपं होईल.
राज्यघटना स्वीकारली या घटनेच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरूवात 2023 मध्ये झाली. त्यावेळी कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नव्या रूपातल्या पुतळ्याचं संसदेच्या परिसरात अनावरण करण्यात आलं. एका हातात राज्यघटना आणि दुसरा हात दिशा दाखवणाऱ्या पुतळ्याच्या शिल्पांमध्ये बदल करत, बाबासाहेब हे कायदेतज्ज्ञ असल्याने वकिली पोषाखातल्या बाबासाहेबांचे शिल्प उभारण्यात आले.
1 Comment
Nice article.