कॉफी बागांमुळे पर्यावरण संवर्धनास मदत! कर्नाटकच्या एनसीएफचा विशेष उपक्रम

Environmental Day : पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे गेल्या काही वर्षापासून संपूर्ण जगाला हवामान बदलाचा फटका बसत आहे. याचा परिणाम माणसाच्या आरोग्यापासून, उद्योगापर्यंत अशा प्रत्येक क्षेत्रावर होत आहे. निसर्गातील प्रत्येक घटकाला याचा दुष्परिणाम सहन करावा लागत आहे. अशावेळी जंगल पुन्हा नव्याने प्रस्थापित करणं हा एक उत्तम उपाय आहे. पण ते साधायचं कसं? याचं उत्तर ही कर्नाटकमधल्या नेचर कन्झर्वेशन फाउंडेशनने शोधलं आहे. पाहुयात जंगलाचं पुनर्वसन कसं करता येईल.
[gspeech type=button]

मानवाने स्वत:च्या फायद्यासाठी पर्यावरणाची अपरिमित हानी केली आहे, हे सत्य कोणतीच व्यक्ती नाकारु शकत नाही. औद्योगिकीकरण आणि वसाहतवाढीसाठी जंगले नष्ट करुन सिमेंटच जंगल उभं केलं. त्यामुळे पर्यावरण आणि जैवविविधतेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवण्यासाठी शेतजमिनीमध्ये रसायने आणि कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सागरी मार्ग, तेलाच्या खाणी शोधण्यासाठी सागरी परिसंस्थेवरही घाला घातला आहे. मात्र, पर्यावरणावरच्या या हल्ल्यामुळे मानवाचंच मोठं नुकसान होत असल्याचं आता लक्षात येत आहे. त्यामुळे नैसर्गिक जैवविविधता, परिसंस्था जपण्यासाठी अनेक होतकरु शास्त्रज्ञ आणि शेतकरीही एक एक पाऊल उचलत आहेत.

याच चळवळीचा एक भाग म्हणून कर्नाटकातली नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन संस्था अभिनव उपक्रम राबवत आहे.  सोहन शेट्टी हा शेतकरी ही या चळवळीशी जोडलेला असून त्यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली आहे. सोहन शेट्टी यांची कर्नाटकातील चिक्कमंगळुरु जिल्ह्यात नर्मदा इस्टेट या नावाने कॉफी इस्टेट आहे. सामान्यत: अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर केला जातो. पण या अतिरिक्त रायासनिक खतांमुळे शेतजमिनीचं आणि उत्पादनाचेही नुकसान होतं. त्यामुळे कीटकनाशकांचा जर बिमोड करायचा असेल तर, त्यासाठी सेंद्रीय पद्धत अवलंबणं गरजेचं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानुसार ते सेंद्रीय पद्धतीने शेती करु लागले. कीटकांचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून एकाच पद्धतीने बी-बियाणे वापरण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे वापरण्याचं त्यांनी ठरवलं. हे वेगवेगळे बियाणे कॉफीचेच नसून तर कॉफी लागवडीमध्ये त्याच्या सोबत वाढू शकतील असे बियाणे शोधण्याचा निर्णय शेट्टी यांनी घेतला.

नेचर कन्झर्वेशन फाउंडेशनशी ओळख

सेंद्रिय कॉफीसोबत वाढतील अशा योग्य वनस्पती शोधण्यासाठी शेट्टी यांनी कर्नाटक वन विभागाच्या रोपवाटिका आणि चिक्कबल्लापूरमधील बियाणे पुरवठादारांची मदत घेतली. आणि कॉफीसोबत वाढू शकतील अशा उत्तम वनस्पती स्रोतांचा शोध सुरू झाला. या दरम्यान त्यांचा संपर्क नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन (एनसीएफ) शी आला. एनसीएफ ही संस्था वर्षानुवर्षापासून तामिळनाडूतील वलपराई येथे जंगलाचं पुनर्संचयित (rainforests restoration) करत असल्याचं त्यांना समजलं. शेट्टी यांनी या संस्थेतल्या लोकांना त्यांच्या उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर संस्थेतल्या अधिकाऱ्यांनी शेट्टी यांना कोणत्या प्रजातीच्या वनस्पती, बियाणे हव्या आहेत याविषयी विचारलं. तेव्हा शेट्टी यांनी दिलेल्या वनस्पतीच्या नावांची यादी पाहून वनस्पतिशास्त्रज्ञाने त्यांना सांगितलं की, या यादीतल्या फक्त तीनच वनस्पती या पश्चिम घाटावरील मूळ वनस्पती आहेत. या भेटीनंतर सोहन शेट्टी यांच्या लक्षात आलं की, “झाडं लावायची म्हणून न लावता, निसर्गाने ठरवून दिलेल्या त्या-त्या परिसंस्थेत त्या-त्यानुसार झाडं लावणं गरजेचं असतं. कारण, कोणत्याही ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे झाडे लावल्याने आपण संपूर्ण परिसंस्थेला गोंधळवून टाकत असतो.”

हे ही वाचा : देशात भूजल प्रदूषणात वाढ! 

एनसीएफच्या नर्सरीला भेट

एनसीएफचे काम जवळून पाहण्यासाठी आणि तयार केलेल्या रोपवाटिका पाहण्यासाठी शेट्टी यांनी 2022 मध्ये हासन जिल्ह्यातील सकलेशपूर तालुक्यातल्या कदमणे इस्टेट्स इथल्या नर्सरीला भेट दिली. या नर्सरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची 5 हजार रोपे होती. तोपर्यंत शेट्टी यांनी स्वतंत्रपणे 1.2 लाख रोपवाटीका तयार केल्या होत्या. या रोपवाटीकांमध्ये विविध प्रजातीतली अनेक रोपं लावता आली असती. शेट्टी यांनी एनसीएफशी पार्टनरशीप करुन एकत्र काम करण्यास सुरुवात केली. या माध्यमातून एनसीएफद्वारे सुरू असलेल्या ‘जंगलाच्या पुनर्संचयनासाठी स्थानिक वनस्पती स्त्रोत म्हणून कॉफी कृषी वनांचा उपयोग’ या अभ्यासाशी शेट्टी जोडले गेले.

पक्ष्यांमुळे परिसंस्थेत विविधता

‘जंगलाच्या पुनर्संचयनासाठी स्थानिक वनस्पती स्त्रोत म्हणून कॉफी कृषी वनांचा उपयोग’ या प्रयोगाच्या सहलेखिका वेदिका दत्ता ओसुरी यांनी कॉफीच्या जंगलातील पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी या कॉफी बागायत इस्टेटला भेट दिली होती. त्यावेळी त्यांचा निरीक्षणामध्ये आढळून आलं की, कॉफीच्या मळ्यामध्ये विविध प्रकारच्या बिया, वनस्पती, स्थानिक दुर्लभ झालेल्या वनस्पती आहेत. यासोबतच पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या वावरामुळे या कॉफीच्या बागेमध्ये अन्य वनस्पती प्रजातीसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत.

स्थानिक नागरिकांचा सहभाग

जंगलाचं पूनर्संचियतकरण करताना जंगलातील बिया गोळा करुन त्या तिथेचं रुजवण्याऐवजी त्याचं जंगलसदृश्य क्षेत्र वाढवणं गरजेचं होतं. त्यामुळे एससीएफने मळनाड (कर्नाटकातील पश्चिम घाटाचा जास्त पावसाचा प्रदेश) या डोंगराळ भागात ज्या जागेवर स्थानिक शेतकऱ्यांनी कॉफीची लागवड केली नव्हती अशा जागेवर रोप लावण्याचा निर्णय केला. यासाठी त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी पार्टनरशीप केली होती. तसंच या रोपांसाठी लागणारे सर्व बियाणे हे जंगलातून गोळा न करता ते कॉफीच्या मळ्यातून गोळा करण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता. याविषयी या अभ्यासाचे प्रमुख आनंद ओसुरी सांगतात की, जंगलातूनच सगळ्या बिया गोळा केल्या तर त्या बियांवर अवलंबून असलेली तिथले पक्षी, कीटक यांच्या उपजिवीकेवर परिणाम झाला असता. त्यामुळे काही बिया जंगलातून तर काही बिया कॉफीच्या मळ्यातून गोळा केल्या.

हे ही वाचा : शेतकचरा जाळण्याच्या घटनेला सरकारी धोरण कारणीभूत! अभ्यासाअंती संशोधकांचा दावा

जंगलाच्या पुनर्संचयीततेसाठी कॉफीच्या मळ्याची का निवड?

भारतात मोट्या प्रमाणावर कॉफीची लागवड केली जाते. कॉफीच्या झाडांमुळे मोठ्याप्रमाणावर सावली निर्माण होते. या झाडांच्या सावलीत जैवविविधता विकसीत होऊ शकते, असं ओसुरी यांचं मत आहे. अनेकदा कॉफीच्या बागेत पडणारे आणि वाढणारे बहुतेक बियाणे प्रकाश आणि इतर संसाधनांसाठी कॉफीच्या झुडुपांशी स्पर्धा करण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी रोपं या मळ्यातून काढून टाकली जातात, त्यामुळे नैसर्गिक जैवविविधतेचं नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी पद्धतशीर उपाय करणं गरजेचं होतं.

यासाठी एनसीएफच्या टीमने कॉफीच्या मळ्यामध्ये आढळणाऱ्या स्थानिक वृक्ष प्रजातींची नोंद केली. यामध्ये जंगल पुनर्संचयनासाठी संबंधित 90 हून अधिक स्थानिक वृक्ष प्रजाती आढळल्या. यामध्ये भारतात कुठेही न आढळणाऱ्या स्थानिक वनस्पती म्हणजे ज्या केवळ पश्चिम घाटावरच आढळतात, अशा वनस्पतींचा समावेश यात होतो. यासोबतच पृथ्वीवर इतरत्र कुठेही आढळत नाहीत आणि ज्यापैकी काही IUCN द्वारे धोक्यात असलेल्या म्हणून वर्गीकृत आहेत अशा प्रजातीसुद्धा त्यांना या कॉफीच्या मळ्यामध्ये आढळल्या आहेत.

एनसीएफ टीम शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या शेतात भेट देऊन, बियाणे गोळा करण्याची आणि पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला वाढणारी लहान रोपे गोळा करण्याची परवानगी मिळवतात. 2023 ते 2024 दरम्यान, 56 स्थानिक वृक्ष प्रजातींच्या सुमारे 18 हजार बियाणे आणि रोपांची एनसीएफने या पद्धतीने त्यांच्या नर्सरीमध्ये पुन्हा लागवड केली आहे. रोपवाटीका, नर्सरी निर्माण करण्यासाठी तिथले स्थानिक शेतकरी त्यांची शेतजमीन उपलब्ध करुन देत असल्याचं ओसुरी यांनी सांगितलं.

हे ही वाचा : प्रदुषणा विरोधातलं युद्ध?

सध्या, पुनर्संचयित प्रकल्प प्रायोगिक टप्प्यात आहे. एनसीएफ टीम दोन सहयोगी उपक्रमांवर लक्ष केंद्रित करत आहे. एक बियाणे स्रोत कॉफी फार्मचे नेटवर्क वाढवणे आणि दुसरं अधिक स्थानिक वनस्पती रोपवाटिका विकसित करण्यावर भर देणं. या प्रयोगामागे एनसीएफचा उद्देश असा आहे की, कॉफी कृषी वनांना केवळ जैवविविधतेचे आश्रयस्थान म्हणून पाहू नये, तर या कॉफीच्या मळ्यांमध्ये पुनर्संचयित करण्यासाठी आणि स्थानिक वनस्पतींचा स्रोत बनून व्यापक भूभागात संवर्धन करण्यातली या कॉफी मळ्यांचं योगदान देण्याची त्यांची क्षमता आहे हे मान्य करावं.

त्यामुळे जर कॉफी मळ्यामधील बियाणे स्रोतांना वन विभागाच्या रोपवाटिकांशी जोडण्यासाठी मॉडेल विकसित करू शकलो, तर जंगल पुनर्संचयित आणि विविध वनस्पतीचं रक्षण करण्याचं प्रमाण आणि क्षमता वाढेल. कारण वनविभागाकडे रोपवाटिकांचे एक उत्कृष्ट नेटवर्क उपल्बध आहे.

भारतातील कॉफी उत्पादनापैकी जवळजवळ 70 टक्के उत्पादन मळेनाडू प्रदेशात होते. मुख्यतः चिक्कमंगळुरुमधील बाबा बुदान टेकड्यांपासून ते दक्षिणेकडील कोडगु पर्यंत हे कॉफीचे मळे पसरलेले आहेत. त्यामुळे जैवविविधता संवर्धन आणि पुनर्संचयनासाठी हा एक महत्त्वाचा प्रदेश आहे. त्यामुळे पर्यावरणीय जैवविविधतेचं रक्षण करायचं असेल तर या संधींचा उपयोग करायला हवा. जंगल पुनर्संचयनासाठी कॉफी उत्पादक आणि जमीन मालकांशी सहयोग करणे, पुनर्संचयनासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनांसह प्रयोग करणे आणि या प्रदेशातील जैवविविधतेमध्ये इतर कोणत्याही प्रकारे योगदान देणं गरजेचं आहे, असं मत ओसुरी यांनी व्यक्त केलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

government schemes : गेल्या 11 वर्षांपासून देशात मोदी सरकार सत्तेत आहे. या काळात त्यांनी ग्रामीण भागासाठी आणि विशेषतः महिलांसाठी खूप
Kerala : केरळमधले जवळपास 941 गावं आहेत, त्यापैकी 273 गावांमध्ये जंगली प्राण्यांचा त्रास खूप वाढला आहे. हे प्राणी म्हणजे कोण?
Finance : आर्थिक वर्ष 2024 - 2025 चा इन्कम टॅक्स भरण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म्स इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध झालेले

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ