अपुरं शिक्षण हे गुन्हेगारीत प्रवेश करणाऱ्या अनेक गुंडांची पार्श्वभुमी असते. अनेकदा शिक्षणाचा अभाव, घरची गरिबी गुन्हेगारांना या दलदलीत घेऊन येते. पण क्वचितच असं होतं, की व्यवस्थित शिक्षण घेतलेले तरुण गुन्हेगारीया क्षेत्रात खेचले जातात. त्यामागे एकतर कौटुंबिक पार्श्वभुमी असते, किंवा त्यांचा टोकाचा नाईलाज. पण मुंबई अंडरवर्ल्डमध्ये एक असा डॉन आहे, ज्यानं बायकोच्या आग्रहा खातर गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला, आणि तो मुंबईचा डॉन झाला. त्याचं नाव आहे अश्विन नाईक. अमर नाईक याचा लहान भाऊ.
इंजिनीयर डॉन
अश्विन नाईक हा मुंबई अंडरवर्ल्डमधला सगळ्यात जास्त शिक्षण घेतलेला डॉन आहे. त्याने सिव्हिल इंजिनीयरची पदवी घेतली आहे. त्यामुळे उच्चशिक्षित आणि अस्खलित इंग्रजी बोलणारा, कोणत्याही हत्येचं प्लॅनिंग काटेकोरपण प्लॅनिंग करणाचा डॉन म्हणून अश्विन नाईकची ओळख आहे.
पार्श्वभुमी
अश्विन नाईक हा गँगस्टर अमर नाईकचा लहान भाऊ आहे. अमर नाईकचा गुन्हेगारीत प्रवेश, त्याचा वाढता दबदबा, या सगळ्या गोष्टी अश्विनच्या समोरच घडत होत्या. पण त्याला कधीही गुन्हेगारीत यावंसं वाटलं नाही. अमर नाईकनही त्याच्या दोन्ही भावांना या गर्देत ओढलं नाही. अजित आयुष्यभर गुन्हेगारीपासुन दुर राहिला. पण अश्विनला मात्र हे जमलं नाही. काही काळानंतर बायकोच्या सांगण्यानुसार तो अमर नाईकच्या गँगमध्ये सहभागी झाला.
वयाच्या 20 व्या वर्षी अश्विन नाईकला अमर नाईकच्या गुन्हेगारी क्षेत्राचा फटका बसला. दादरच्या भाजी मार्केटमध्ये अमर नाईकनं ज्या गुंडांशी दुष्मनी केली होती, त्या पोत्या भाईच्या लोकांनी अमरला धडा शिकवण्यासाठी अश्विनला किडनॅप केलं. त्याला एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर डांबुन ठेवण्यात आलं होतं. अश्विनला त्यावेळी गुन्हेगारीबदद्ल फार काही माहीत नव्हतं, पण जर आपण इथुन सुटका करुन घेतली नाही; तर आपल्या भावाला त्रास होईल, या विचारानं त्यानं त्या खोलीच्या खिडकीतून उडी मारली आणि स्वत :ची सुटका करुन घेतली. त्याच्यावर पहारा देणाऱ्या गुंडांना सकाळपर्यंत याचा पत्ताही लागला नाही. छोट्या भावाच्या किडनॅपिंगच्या घटनेनंतर अमरनं पोत्या गँगवर हल्ले करुन त्यांना हैराण करुन सोडलं. यामुळे दादर परिसरात पोत्या गँगचा दरारा कमी झाला.
अश्विन नाईकचं प्रेमप्रकरण
शिक्षण घेत असतानाच अश्विनची ओळख झाली नीता या एका गुजराती मुलीशी झाली. ती गुजराती कुटुंबातली होती. कॉन्व्हेंट शाळेमधुन तिचं शिक्षण झालेलं. नीता आणि अश्विन या दोघांच्या प्रेमसंबंधाला नीताच्याकुटुंबियांचा विरोध होता. नीता ही सोफिया कॉलेजमध्ये शिकत होती. तर अश्विन उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेला. तरिही त्याचं प्रेमप्रकरण थांबलं नव्हतं. अश्विन नाईकने अमेरिकेहून सिव्हिल इंजिनीयरची डिग्री घेऊन भारतात परत आला. त्यानंतर त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं.
टर्निंग पॉइंट
लग्नानंतर नीता आणि अश्विनला दोन मुलं झाली. अश्विनला कधीच गुन्हेगारी क्षेत्राचं आकर्षण नव्हतं. गँगस्टर अमर नाईकचा भाऊ अशी त्याची ओळख होती. या ओळखीमुळे अनेकदा अन्य गुन्हेगारांकडून अश्विन नाईकला टार्गेट केलं जायंच. त्याच्यावर हल्ले केले जायेच. त्यामुळए या सगळ्यापासून दूर जाण्यासाठी नीता आणि अश्विननं चेन्नईला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. घराची शोधाशोध करण्यासाठी ते दोघंही चेन्नईच्या फेऱ्या मारु लागले. एकदा चेन्नईहुन परत येताना, विमानतळातुन बाहेर पडल्यावर अश्विन नाईकच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्यात अश्विन वाचला पण त्याच्यासोबत असलेले त्याचे दोन साथीदार मारले गेले. या घटनेने नीता पुर्णपणे हादरून गेली. पण तिने यातून पळ काढण्याऐवजी अश्विनला अमरच्या गँगमध्ये सहभागी व्हायला भाग पाडलं. ही गोष्ट काही वर्षांनंतर नीतानं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कबुल केली. यासाठी तिने अश्विनची मानसिक तयारी केली, सतत पाठपुरावा केला. आणि अशा प्रकारे अश्विन नाईकचा गँगस्टर अश्विन नाईक म्हणून प्रवास सुरु झाला.
हत्येचं प्लॅनिंग करण्यात तरबेज
अश्विन नाईक हा बुद्धीमान होता. त्यानं त्याच्या हुशारीचा वापर करत नाईक गँगमध्ये लवकरच महत्वाची जागा निर्माण केली. असं म्हणतात की, नाईक गँगनं घडवुन आणलेल्या सुनील खटाव हत्येचा कट हा अश्विननं रचलेला होता. तसंच अरुण गवळी गँगचा शुटर तान्या कोळी याची नाईक गँगनं कल्याण स्टेशनला थांबलेल्या ट्रेनमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत हत्या केली होती, तो प्लानही अश्विनचा होता. अशा अनेक घटनांनंतर अश्विन नाईकचा गँगमधला दबदबा आणखी वाढला. अरुण गवळीला मात्र त्याच्यापासुन धोका जाणवत होता.
कायमचं अपंगत्व
1992 च्या दरम्यान त्याला पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. केस सुरु झाल्यानंतर 18 एप्रिल 1994 ला केसच्या सुनावणीसाठी पोलीसांनी अश्विनला नेहमीसारखंच मुंबईच्या सेशन्स कोर्टात घेऊन आले होते. सुनावणी संपल्यानंतर जेव्हा अश्विन पोलिसांच्या गाडीत बसायला जात होता तेव्हा वकिलाच्या गणवेशात असलेल्या राजेंद्र सावंत नावाच्या व्यक्तीनं त्याच्यावर गोळ्या झाडल्या. राजेंद्र सावंत हा अरुण गवळीच्या गँगमधला गुंड होता. आणि ही त्याची पहिलीच सुपारी होती. या गोळीबारात एक गोळी अश्विनच्या पाठीच्या मणक्यात घुसली. त्याला जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. या हल्ल्यातून तो वाचला पण मणक्यात घुसलेल्या गोळीमुळे त्याचं कमरेखालचं पूर्ण शरीर निकामी बनुन त्याला कायमचं अपंगत्व आलं.
त्यानंतर त्याला तुरुंगातून जामीन मिळाला. तेव्हा त्याने परत पळून जाण्याचा निर्णय घेतला. तो बांग्लादेशमार्गे अमेरिकेत गेला.
नीता नाईकने सांभाळला व्यवसाय
अश्विन नाईक जेलमध्ये गेल्यानंतर त्याचा व्यवसाय नीता नाईकने सांभाळला. अश्विन नाईक फरार झाल्यानंतर ती एकटी पडली. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर सुरक्षित राहण्यासाठी तिने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. 1991 च्या आसपास नीतानं शिवसेनेकडुन मुंबई महानगरपालिकेची निवडणुक लढवत ती नगरसेवक झाली. त्यानतंर 1995 ला ती बीएमसी स्टँडींग कमिटीची अध्यक्ष बनली. याच काळात म्हणजे 1996 मध्ये अमर नाईक हा पोलिस एन्काऊंटरमध्ये मारला गेला.
अश्विन आणि नीता नाईकच्या नात्यात दुरावा
अश्विन नाईक अमेरीकेत असताना त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. त्यांचं एकमेकांशी बोलणं कमी झालं. अश्विन नाईक 2003 मध्ये भारतात परत आला. त्याने मुंबईत येण्याएवजी नाव बदलुन दिल्लीत रहायला सुरुवात केली. याची माहिती फक्त नीताला होती. ती अधुनमधून त्याला भेटायला जायची. पण काही दिवसांनी पोलिसांनी राहत्या घरी जाऊन अश्विन नाईकला अटक केली. त्याची रवानगी थेट तिहार तुरुंगात केली. अश्विन नाईक कुठे आहे याची टीप नीता नाईकनेच पोलिसांना दिलेली अशी त्यावेळी चर्चा होती.
अश्विनलाही तिच्यावर संशय होता. त्यामुळे त्याने आधीपासूनच त्याच्या खास माणसांकरवी तिच्यावर नजर ठेवली होती. नीता नाईकचे तिच्या बॉंडीगार्डबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती ही अश्विन नाईकला मिळाली होती.
नीता नाईकची हत्या
2005 मध्ये नीताची तिच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येचा आरोप अश्विन वर ठेवण्यात आला. कारण त्याच्याच माणसांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानं आरोप फेटाळून लावले. पण गोळ्या झाडणाऱ्या शुटर्सनं सांगितलं की, त्याच्याच सांगण्यावरुन तिला संपवण्यात आलं. 2009 मध्ये पुराव्यांआभावी त्याला या केसमधुन निर्दोष मुक्त करण्यात आलं.
सगळ्यात आरोपांतुन सुटका
अश्विन नाईकला अटक झाल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अनेक खटले चालवण्यात आले. पण कालांतरानं तो सगळ्या खटल्यांतुन मुक्त झाला. त्यानंतर त्याला त्या वाटेकडे जायचं नव्हतं. जिच्यासाठी आणि जिच्यामुळं आपण ही गुन्हेगारीची वाट धरली, तिनंच आपल्याला धोका दिला. ही भावना अश्विन नाईकच्या मनात निर्माण झाली. बदलत्या परिस्थितीत अनर नाईक, नीता नाईक असं कोणित अस्तित्वात नव्हतं म्हणून अश्निनंही हा मार्ग सोडून दिला. आणि सर्वसमान्य आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला.
सध्या अश्विन नाईक हा रिअल इस्टेटचा व्यवसाय करत नॉर्मल आयुष्य जगतोय.
सामान्य आयुष्य जगणारा एकमेव गँगस्टर
मुंबईत आता ना कोणती गँग शिल्लक राहिलीये, ना कोणता गँगस्टर म्हणूनच अश्विन नाईकला त्याच्या गुन्हेगारीच्या वाटेवरुन परतणं आणि सामान्य आयुष्य जगणं शक्य झालंय. जे याआधी कोणत्याच गँगस्टरला शक्य झालं नाही.