लापता लेडीज ते स्त्री 2

Cinema : लापता लेडीज', 'स्त्री 2' सारखे सिनेमांचे विषय, त्या सिनेमांचं यश बघितल्यावर एक लक्षात येतं की, 'स्त्री' ही कलाकृतीच्या यशासाठीही महत्वाचा रोल प्ले करते. बॉलीवूडच्या भाषेत सांगायचं तर, "वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है |" या बदलाची सुरुवात कधीपासून झाली आणि कसा हा बदल घडत गेला ?
[gspeech type=button]

सिनेमा खरंच समाजमन तयार करतो?

कुडीयो का है जमाना” हे शब्द आपण पहिल्यांदा 1994 मध्ये हम आपके है कौन’ च्या गाण्यात ऐकले होते. या कौटुंबिक सिनेमाच्या यशानंतर महिलांचा समाजातील मान वाढेल, दर्जा सुधारेल अशी सर्वांनी आशा केली होती. काही अंशी हा बदल घडला देखील. पण, अशातच घडलेल्या काही घटना बघितल्या कीजाणवतं की, ‘तीआजही पूर्णपणे कुठेही सुरक्षित नाहीये. समाधानाची बाब इतकीच आहे की, निदान बॉलीवूडमध्ये सध्या मुलींचा काळ आला आहे. जसा सिनेमात दिसतो तसा आपला समाज घडत असतो, मत तयार करत असतो. हे जर खरंच खरं तर येत्या काळात महिलांना कोणताही दुजाभाव सहन करावा लागणार नाही, प्रत्येक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सिंहाचा वाटा असणार, नायकापेक्षा अधिक मानधन त्यांचं असणार हे नक्की. हे सर्व घडण्यासाठी 2024 हे वर्ष उजाडावं लागलं हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल.

लापता लेडीज’, ‘स्त्री 2′ सारखे सिनेमांचे विषय, त्या सिनेमांचं यश बघितल्यावर एक लक्षात येतं की, स्त्री’ ही कलाकृतीच्या यशासाठीही महत्वाचा रोल प्ले करते. बॉलीवूडच्या भाषेत सांगायचं तर, “वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है |” या बदलाची सुरुवात कधीपासून झाली आणि कसा हा बदल घडत गेला ?

चांगल्या बदलाची सुरुवात झालीय

एक काळ होता जेव्हा काही निमशहरी भागात घरासाठी उत्पन्न कमावणारी व्यक्ती ही त्या घरातील पुरुष असायचे. त्यामुळे कोणता सिनेमा बघायचा ? कोणत्या नाटकाला जायचं ? सारखे निर्णय हे पुरुषच घ्यायचे. आज खऱ्या अर्थाने जमाना बदलला आहे. आज स्त्रियांचं नोकरी किंवा व्यवसाय करण्याचं प्रमाण हे कितीतरी पटीने वाढलं आहे. तिच्याही नकळत ती बऱ्याच प्रॉडक्टसाठी लोकांची इन्फ्लुएन्सर’ बनते. लोक तिला सिरियसली घेत आहेत. तिच्या रेकमंडेशनला एक वजन आलेलं आहे. शिवाय अशा कित्येक यशस्वी तीया सोशल मीडियावर एकमेकींशी कनेक्टेड असतात. मान्य करा अथवा नका करू, पण आजचं मार्केट हे  स्त्रिया डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली रन करत आहेत. 

नव्या ट्रेंडच्या केंद्रस्थानी

मनोरंजन क्षेत्र हे आपण इतकी वर्ष हलक्याने घ्यायचो किंवा त्या क्षेत्राकडे अर्थव्यवस्थेला बळकटी देणारं क्षेत्र म्हणून बघितलं जायचं नाही. पण, आता गोष्टी बदलल्या आहेत. आता प्रत्येक सिनेमा हा खूप विचारांती बनवला जातो. जसं इतर प्रॉडक्ट्सच्या कंपन्या या आपला टार्गेट ऑडियन्स’ निवडत असतात तसंच सिनेमाचे कथाकार, निर्माते हे देखील नेहमी आपला प्रेक्षकवर्ग चोखंदळपणे निवडत असतात. प्रेक्षक म्हणून आपल्याला असं वाटत असतं की, सर्व मीडिया प्लॅटफॉर्म्स हे वेगवेगळे आहेत. पण, तसं नाहीये. सर्व प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या ट्रेंड्सचा अभ्यास करूनच कोणतीही पटकथा ही  आकार घेत असते. बाईपण भारी देवाया मराठी सिनेमाचं उत्तुंग यश आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्या निमित्ताने रंगलेले विचारसत्र हे एका नव्या ट्रेंडची नांदी होती.

प्रत्यक्षातल्या ताकदीच्या भूमिका

महिला सक्षमीकरण’ हा विषय सध्या सर्वत्र सुरू आहे आणि त्याची गरज देखील आहे. मग त्यामध्ये बॉलीवूड तरी मागे कसं रहाणार ? तुम्ही मागच्या दोन वर्षातील कोणताही हिट सिनेमा बघा, अगदी रॉकी और रानी की प्रेम कहानीसारखा टुकार सिनेमाचं उदाहरण घ्या. त्यामध्ये देखील कित्येक सीन हे महिलांचं समाजातील महत्व, पुरुषांचं त्यांच्या मानसिकतेबद्दल असलेलं अज्ञान यावर चित्रित करण्यात आलेले आहेत.

गोड मुळूमुळू चौकट मोडली

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रदीप सरकार यांचं दिगदर्शन असलेल्या मर्दानी’ मध्ये प्रेक्षकांना नारी शक्तीची पहिली झलक दिसली होती. इतकी वर्ष गोड भूमिका साकारणाऱ्या राणी मुखर्जीला या सिनेमात निर्माता आदित्य चोप्राने सिनियर इन्स्पेक्टर शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारण्याची संधी दिली आणि राणीने त्या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं. दिल्लीच्या रस्त्यावरून गायब होणाऱ्या लहान मुलींच्या प्रकरणाचा जेव्हा शिवानी रॉय शेवटच्या सीनमध्ये छडा लावतात आणि गुन्हेगाराला पीडित मुलींच्या हवाले करतात, तेव्हा थिएटरमधील प्रत्येक प्रेक्षकाच्या अंगावर काटा येतो आणि तो पण त्या गुन्हेगारांना “मार … ” असं म्हणायला लागतो. ह्याला म्हणतात कनेक्ट‘, ह्याला म्हणतात इम्पॅक्ट‘. 

विचार बदलायला मदत

नारी शक्ती’ ची ताकत या आधी 2007 च्या चक दे इंडियामधून प्रेक्षकांना जाणवली होती. भारतीय मुली जेव्हा हॉकीच्या खेळात जगात सरस ठरतात आणि जगात आपल्या देशाची, आपल्या कोचची मान उंचावतात तेव्हा प्रत्येक मुलीच्या पित्याला आपल्याला मुलीचा अभिमान वाटत होता. प्रत्येक भावाच्या मनात  आपल्या बहिणीची गरज पडेल तेव्हा मदत केली पाहिजे अशी भावना निर्माण झाली होती. आपल्या मुलींना स्वप्न बघू द्यावेत हे या सिनेमाने आपल्याला शिकवलं. “मुलगी म्हणजे ओझं” ही भावना, भीती या आणि अशा सिनेमाने लोकांच्या मनातून काढून टाकण्याचं मोलाचं कार्य केलं आहे.

महिला मुख्य कलाकार

भारत देशाप्रमाणे बॉलीवूड सुद्धा एकेकाळी पुरुष प्रधान संस्कृतीसाठी ओळखलं जायचं. नायक अमिताभ घ्या किंवा सलमान घ्या, हिरोईन काय कोणीपण चालेल. ताटामध्ये तोंडी लावण्या इतकी चटणी घेतो तशी नायिकेची गरज सिनेमांसाठी असायची. 21 व्या शतकात मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. स्त्रीया नावाची फ्रॅंचाईझी आज 700 कोटींच्या घरात कमाई करतो हे बॉलीवूड सिनेमाच्या इतिहासाकडे बघता खूप कौतुकास्पद आहे. स्त्री मधली श्रद्धा कपूर ही एक भूत असूनही प्रेक्षकांना ती सुंदर वाटते आणि ती दुसऱ्या भागातही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणते ही समस्त स्त्री कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. स्त्री 2′ मध्ये जेव्हा श्रद्धा कपूर आपल्या वेणीने व्हिलन सरकटाचा सामना करते तेव्हा ती “आम्हाला कमी लेखू नका” असं सांगत आहे असं वाटतं.

खऱ्या जीवनाचा आरसा

लापता लेडीजदेखील याच री ला पुढे ओढत सांगतो की, देश स्वतंत्र होऊन आता 75 पेक्षा अधिक वर्ष झाली आहेत. आता तरी ग्रामीण भागातील महिलांना घुंगट’ पासून स्वतंत्र करा. त्यांना आपला होणारा जोडीदार डोळसपणे बघण्याचा, निवडण्याचा अधिकार द्या. या सिनेमात दोन जोडप्यांची होणारी चुकामुक ही केवळ प्रातिनिधिक स्वरूपात दाखवण्यात आली आहे. कथेच्या आधारे निर्माता, दिग्दर्शकाने हे सांगितलं आहे की, युगं लोटली पण आजही आम्ही महिलांच्या सामर्थ्याला ओळखण्यात चूक करत आहोत. महिला या आजही केवळ पुरुषांच्या आवडीचंच जेवण तयार करतात, पुरुषांना जेवण वाढतात, त्यांचं जेवण झाल्यावर त्याच ताटात स्वतः जेवतात हे आजही सुरू आहे हे निर्मात्यांनी आरसा दाखवल्यासारखं पडद्यावर दाखवलं.

पुरुषांची घालमेल

शहरी भागातील महिला प्रेक्षकांना हे बघतांना गाव बघण्यासाठी निघालो आहोत असं वाटलं. पुरुष प्रेक्षकांना सिनेमाचा नायक दीपकची आपल्या खऱ्या  पत्नीसाठी होणारी घालमेल जाणवली.”ओ सजनी रे…  कैसे कटे दिन रात” हे गाणं सुरू झालं की पुरुषांना असं जाणवलं की, आपल्या बाजूला बसून सिनेमा बघणारी आपली ही लाईफ पार्टनर जर काही काळासाठी अशी लापताझाली तर आपली काय परिस्थिती होईल ? शेवटच्या सीनमध्ये जेव्हा ती “दीपक” म्हणत स्टेशनवर त्याला हाक मारते तेव्हा सिनेमा एकाग्रतेने बघणाऱ्या प्रत्येकाला त्यांचं एकत्र येणं प्रचंड आवडतं आणि सिनेमा प्रेक्षकांची दाद मिळवतो.

आई होऊन प्रत्येकाला जन्म देऊनही ज्या स्त्रीने इतकी वर्ष आपल्या अस्तित्वासाठी, योग्य मान मिळवण्यासाठी संघर्ष केला तिच्यासाठी येणारा काळ हा आधी सहन केलेलं सर्व विसरून टाकायला लावणारा असेल अशी या सर्व सिनेमांच्या निमित्ताने आशा करूयात.

1 Comment

  • Shashikant Dhale

    खूप छान लिहिलं आहेस आशिष..!

    🌹🌹🌹

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि
Agricultural Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील भागांमध्ये आपण या उद्योगांची अधिक माहिती घेत आहोत.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ