समद खान – दाऊदचा सगळ्यात मोठा दुष्मन

Samad Khan : करीम लालाच्या पठाण गँगनं 1960 पासुन जवळपास 1980 पर्यंत मुंबईवर राज्य केलं. करीम लालाने गँगची सुत्रे पुढे आपल्या पुतण्याकडे म्हणजे समद खानकडे दिले. पण समद खानच्या तापट स्वभावामुळे करीम लालाने चक्क समद खानसोबतचे संबंध तोडले. त्यानंतर समद खान अंडरवर्ल्डमध्ये टिकला की नाही... वाचा या लेखात.
[gspeech type=button]

करीम लालाच्या पठाण गँगनं 1960 पासून जवळपास 1980 पर्यंत मुंबईवर राज्य केलं. दाऊदचा मुंबईत उदय होईपर्यंत मुंबईत अंडरवर्ल्डही शांत होतं. कुणी एकमेकांच्या हद्दीत आणि व्यावसायात घुसखोरी करत नव्हतं. पण डी कंपनीनं मुंबई अंडरवर्ल्डचा चेहरा मोहरा बदलून टाकला. करीम लाला यांनी पुढे पठाण गँगची सूत्रे  त्याचा पुतण्या समद खानकडं दिली. पण समद खानच्या खुनशी आणि तापट स्वभावामुळं पठाण गँगचं मुंबईतलं अस्तित्व संपुष्टात आलं. 

समद खान हा लहानपणापासुन चांगल्या घरात वाढलेला होता. त्याचं शिक्षण कॉन्हेंटमध्ये झालेलं होतं. त्यामुळं तो अस्खलीत इंग्लिश बोलायचा. तिशीच्या आतच त्यानं मुंबई अंडरवर्ल्डमध्ये त्याची जागा निर्माण केली होती. दाऊद नसता तर समद खाननं मुंबईवर राज्य केलं असतं आणि पठाण गँग पुढची अनेक वर्ष कार्यरत राहिली असती. पण समद खानच्या स्वभावानं त्याचा घात केला. 

तापट स्वभावचे बळी

समदच्या तापट स्वभावाची किंमत अनेकदा निष्पाप लोकांना मोजावी लागायची. यासाठी व्यावसायिक रणवीर जैनचा किस्सा प्रसिद्ध आहे. समद खानला रणवीर जैनला मारण्याची सुपारी मिळाली. जैन सिरॉक हॉटेलमध्ये थांबला होता. त्यावेळी समद खानने थेट सिरॉक हॉटेलमधल्या रणवीर जैनच्या खोलीमध्ये जाऊन त्याला जैनला गोळ्या घातल्या आणि तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला समजलं की त्यानं रणवीर जैनच्या एवजी जैन नावाच्या दुसऱ्याच व्यक्तीला गोळ्या घातल्या आहेत. हे समजल्यावर तो पुन्हा हॉटेलमध्ये गेला आणि त्यानं रणवीर जैनला संपवलं. नावाच्या साधर्म्यामुळे आणखी एका व्यक्तीचा हकनाक मृत्यू झाला.

पठाण गँगचा वारसदार होण्याची इच्छा

करीम लालाची पठाण गँग ही 1960 सालापासून मुंबईत राज्य करणाऱ्या महत्वाच्या तीन गँगपैकी एक गँग होती. समद खान हा करीम लालाच्या भावाचा मुलगा होता.  80 च्या दशकात मात्र मुंबईवर राज्य करणाऱ्या या तिन्ही गँगचा प्रभाव कमी होऊ लागला.  नविन गँग आणि गँगस्टर्स तयार होत होते. करीम लालाही थकला होता.  अशा परिस्थितीत संपूर्ण गँग ही समद खान यांच्याकडेच वारसदार म्हणून पाहत होती. समद खान ही त्याच अविर्भावात असे. 

दाऊद आणि समदची दुश्मनी

1980 चं दशकाच्या सुरुवातील मुंबईत दाऊदचा उदय झाला. त्याचवेळी समद खानचाही दबदबा वाढत होता. या दोघांनाही मुंबईवर राज्य करायचं होतं. आणि त्यात त्यांना कोणीही भागिदार नको होतं. त्यामुळं दोघंही एकमेकांच्या जिवावर उठले होते. करीम लालानं दोघांमध्ये अनेकदा समझोता घडवून आणला होता. कारण करीम लाला आणि दाऊदच्या वडीलाचं मैत्रिपूर्ण नातं होतं. दाऊद हा करीम लालाला चाचा म्हणायचा. केवळ करीम लालाच्या विनंतीमुळे दाऊद हा समदवर उघडपणे वार करत नव्हता.  

या तणावाच्या परिस्थितीतच 1881 मध्ये दाऊदचा मोठा भाऊ शब्बीरचा खून झाला. हा खून समद खाननं घडवून आणला होता याची दाऊदला खात्री होती. दाऊदला त्याचा बदला घ्यायचा होता. यासाठी दाऊदला तब्बल पाच वर्षे म्हणजे 1986 सालापर्यंत वाट बघावी लगाली. 

वृत्तपत्रातून समद खानसोबतचे संबंध संपवले !

करीम लाला हा समद खानच्या वागणूकीमुळे त्रस्त होता. करीम लाला यांच्या नकळत समद खान हा अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये भाग घ्यायचा. याचा जाब करीम लालाला द्यायला लागायचा. वेळोवेळी माहीत नसलेल्या गुन्ह्यांमुळे करीम लाला अडचणीत यायचा. अशाच एका हत्येच्या खटल्यात मुंबई पोलिसांनी करीम लालाला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी करीम लाला समोर पर्याय ठेवला की, समद खानला शरण यायला सांग नाहीतर सगळे गुन्हे हे तुझ्या नावावर येतील. शेवटी समद खान पोलिसांपुढे शरण आला. आणि काही महिन्यातच तो जामिनावर बाहेरही आला. या घटनेनंतर करीम लालाचा मित्र हाजी मस्तान यांने ही करीमला समद खान सोबतचे संबंध तोडण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, करीम लालाने वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊन, समद खानसोबत आजपासूनचे सगळे संबंध संपल्याचं स्पष्ट केलं. समदला याची माहिती मिळताच तो हादरुन गेला. कारण करीम लाला यांच्या गँगच्या सुरक्षा कवचमुळेच तो मुंबईत राहू शकत होता. करीम लालाशिवाय एक दिवसही जगणं मुश्किल आहे याची त्याला जाणीव होती. 

काकानं हात सोडल्यानंतर थेट दाऊदशीच मैत्री

करीम लालानं सगळे संबंध तोडून टाकल्यावर समद खान हा थेट दाऊदकडे गेला. दाऊद आणि त्याचे संबंधही चांगले नव्हते. दोघेही एकमेकांवर हत्या करण्याच्या संधीच्या शोधात होते. याची माहिती सगळ्यांना होती. तरिही समदने दाऊद पुढे मैत्रीचा हात पुढे केला. समदच्या या कृत्यामुळे दाऊदही आश्चर्यचकित झाला. त्याने हुषारीने समदचा प्रस्ताव स्वीकारला. पण या दोघांची मैत्री एक दिवसही टिकू शकली नाही. 

समद खानचा मृत्यू

दाऊदशी मैत्री केल्याच्या दुसऱ्याच दिवशी समद खान त्याच्या साथीदारांसह एका बारमध्ये दारु पित बसला होता. तिथंच दाऊदचा भाऊ नुराही आला होता. नुरा हा समद खानबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोलू लागला. “करिम लाला नसता तर दाऊदनं याला कधीच संपवलं असतं” नुराच्या या वक्तव्यानंतर मात्र, समदचा पारा चढला. त्याने आदल्या दिवशीच दाऊदशी मैत्री केली आहे, हे तो विसरुन गेला आणि त्याने नुराला मारायला सुरुवात केली. समदने नुराला रक्तबंबाळ होईस्तोवर मारलं. तिकडे डी गँगची बरीच लोकं होती पण कोणीच त्या दोघांच्या भांडणात पडलं नाही. अगदी दाऊदला या घटनेची माहिती मिळाल्यावर तो ही समदला काही बोलला नाही. त्यामुळे समदला वाटलं की मैत्रीच्या नात्यामुळे आपण जे काही केलं ते योग्यच केलं. पण समदने दाऊदला पुरतं ओळखलं नव्हतं. समद तापट स्वभावाचा होता. तर दाऊद शांत स्वभावाचा होता. शांत राहून शत्रूचा काटा कसा काढायचा यात तो पारंगत होता. मात्र, या सगळ्या घटनेनंतर समद मात्र कमालीचा बिनधास्त होऊन वागू लागला. 

असाच एक दिवस समद हा भुलेश्वरला त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. ती त्याची नेहमीची लपायची जागा होती. तिकडून तो दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर जायला निघायचं होतं. याची खबर दाऊदला मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी दाऊद छोटा राजनसह त्याच्या काही साथीदारांना घेऊन तिकडे पोहोचले. ठरल्याप्रमाणं समद खान सकाळी घरातून निघाला आणि रस्त्यावर आला. त्याचवेळी हे दाऊद, छोटा राजनसह पाच जण त्यांच्यापुढे उभे राहिले. समदला काही समजायच्या आतच त्या पाचही जणांनी त्याच्यावर गोळीबार करायला सुरुवात केली. या पाचही जणांच्या बंदुकीतल्या गोळ्या संपेपर्यंत त्यांनी गोळीबार सुरू ठेवला. असं म्हणतात की समद खानच्या शरीरात 20 पेक्षा जास्त गोळ्या होत्या. 

प्रतिस्पर्ध्याच्या मृत्यूनंतर मुंबई सोडली

दाऊदने त्यांच्या जानी दुश्मनाचा बदला हा अशा पद्धतीने घेतला होता. समद खानच्या हत्येनंतर दाऊद कायमचा मुंबई सोडून पळून गेला. त्यावेळच्या पोलिस अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की, जर समद खानची हत्या झाली नसती तर कदाचित तोच मुंबई अंडरवर्ल्डचा बादशाह झाला असता. कारण मुंबई अंडरवर्ल्डचा राजा होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. कदाचित समद खानच्या हत्येनंतर लगेच पोलिसांनी दाऊदला अटक केली असती, तर दाऊदही आज इतका मोठा होऊ शकला नसता. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ