सातारा जिल्ह्यात 19 ऑगस्ट पर्यंत पर्यटन स्थळांवर जाण्यास निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय योग्य की अयोग्य?

Satara : सातारा जिल्ह्यातील पर्यंटन स्थळांवर कोणताही अपघात होऊ नये, कायदा-सुव्यवस्था राखली जावी या उद्देशाने जिल्ह्याधिकारी संतोश पाटील यांनी 19 ते 20 ऑगस्टपर्यंत पर्यंटन स्थळांवर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधामुळे पर्यंटकांचा ओघ कमी झाला आहे. याचा परिणाम तिथल्या स्थानिक रोजगारावर झाला आहे. 

सातारच्या सेंद्रीय केशर आंब्याला राज्यभरातून मागणी!

Satara: काटेकर यांच्या पद्धतीनं आंबा रोपाची लागवड केल्यावर साधारणपणे रोप लावलेल्या दिवसांपासून दोन ते तीन वर्षात या झाडांना मोहर येतो. त्यावेळी गाईचे गोमूत्र, कंपोस्ट खत, गांडूळ खत याचा वापर केला जातो. मोहर आल्यानंतर झाड कमकुवत वाटत असेल तर तो मोहर काढूनही टाकला जातो. 

केबल स्टे ब्रिज या प्रोजेक्टमुळे सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याची कनेक्टिविटी वाढणार

The Cable Stay Bridge project : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा केबल स्टे ब्रिज उभारण्यात येत असून महाबळेश्वहून कोकणात जाण्यासाठी हा नवीन जवळचा मार्ग तयार करण्यात येणार आहे. या वर्षाच्या डिसेंबर अखेरीस हा ब्रिज सुरू होणार आहे. केबल स्टे ब्रिजमुळे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरहून रत्नागिरी हे अंतर जवळपास 50 किलोमीटरने कमी होणार आहे.

पाठरवाडीतील भैरवनाथ यात्रेसाठी मानाच्या सासनकाठ्या

भैरवनाथ यात्रा : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावच्या पश्चिमेस डोंगरावर पाठरवाडी वसली आहे. इथे श्री भैरवनाथ देवाचे मंदिर आहे. गुढीपाढव्याच्या तिसऱ्या दिवशी पहाटे पाठरवाडीच्या श्री.भैरवनाथ देवाचा पालखी सोहळा पार पडतो.

बावधनच्या बगाड यात्रेचा उत्साह

बगाड यात्रा : सर्वत्र रंगपंचमीचा धूम असताना बावधन मात्र गुलाबी रंगानी न्हाऊन निघते. ‘बगाड’ यात्रेत एका व्यक्तीचा नवस फेडण्यासाठी राज्यभरातून लाखो लोकं सहभागी होतात. ही बगाड यात्रा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक बावधन गावात येत असतात. डोळ्याचे पारणे फेडणारी बावधनची बगाड यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा म्हणून ओळखली जाते.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ